मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावा करत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना खडसावले. मालवणीतील अतिक्रमण आणि एका शैक्षणिक संस्थेवरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.


मुंबई पालिकेच्या मालवणी टाऊनशिप शाळेतील शिक्षक भरतीवरून वादाला सुरुवात झाली. अस्लम शेख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “स्वयंसेवी संस्थेमार्फत या शाळेत शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. मात्र, हे शिक्षक टीईटी किंवा सीटीईटी या कोणत्याही परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत. अपात्र शिक्षकांच्या भरतीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यात खेळखंडोबा सुरू आहे”, असा आरोप त्यांनी केला.


मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या आरोपांना उत्तर देताना मुंबई महानगरपालिकेच्या धोरणाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “बीएमसीने २००७ पासून शाळा खासगी संस्थांना दत्तक देण्याचे धोरण राबवले आहे. या धोरणांतर्गत आजपर्यंत ३७ शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत. या संस्थांना फक्त शिक्षकांचे पगार आणि शाळा चालवण्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी असते, त्यांना शाळेवर कोणताही मालकी हक्क मिळत नाही.” लोढा यांनी पुढे सांगितले की, मालवणी टाऊनशिप शाळा पूर्वी फझलानी ट्रस्टसोबत भागीदारीत चालवली जात होती. तेव्हा स्थानिक आमदारांना (अस्लम शेख) कोणताही आक्षेप नव्हता. आता फझलानी ट्रस्टने जबाबदारी नाकारल्याने प्रयास फाउंडेशन पुढे आले आहे. पालकांचीही तीच मागणी आहे.


“मी सहपालकमंत्री या नात्याने पालकांच्या बाजूने उभे राहतो, त्यात काय चुकीचे आहे? विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होत असेल, तर त्याला स्थानिक आमदारांचा विरोध कशासाठी? महापालिका शाळांसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) धोरण राबवताना सर्वांना समान न्याय दिला जाईल”, असेही त्यांनी स्पष्ट केले.


 

१०० एकर सरकारी जमिनीवर कब्जा

पुढे मंत्री लोढा यांनी मालवणीतील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “मी पालकमंत्री या नात्याने तिथे गेलो असताना मला धमकी देण्यात आली. २०१० मध्ये मालवणीमध्ये एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्के होती. आता २०२५ मध्ये ती ३६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. या लोकांनी १०० एकर सरकारी जमिनीवर कब्जा केला आहे. हे लोक कुठून आले? या बदलामागे काय कारण आहे?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment

Maharashtra Board 10th Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग पुन्हा अव्वल, छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज

Minister Sanjay Shirsat : एमआयएम 'कॉर्पोरेट जिहाद'चे मास्टरमाइंड, मंत्री संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप

मुंबई : राज्यातील सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्या 'कॉर्पोरेट जिहाद' (Corporate Jihad) प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापू

Pune Illegal Schools : पालकांनो सावधान! पुणे जिल्ह्यातील तब्बल ४५ शाळा ठरल्या ‘बोगस’; प्रवेशापूर्वी ही यादी एकदा नक्की पाहा

पुणे जिल्हा परिषदेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; काही शाळांकडे मान्यता नाही तर काही शाळा परवानगीशिवाय

TCS Case : छत्रपती संभाजीनगरच्या फ्लॅटमध्ये लपली होती निदा खान; सोबत होते ‘हे’ ५ जण, प्रकरण अधिक गूढ

छत्रपती संभाजीनगर : नाशिकमधील टिसीएस (TCS) कंपनीतील कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी घडामोड

Pune Crime News : 'लग्न दुसऱ्याशी कसं काय?' जाब विचारत घरात घुसला अन् थेट तरुणीचा गळाच चिरला...आरोपी अटकेत

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune Crime News) गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पुण्यातील चंदननगर

Shakti Kapoor On Rumors : "मी जिवंत आणि सुखरूप आहे!"; निधनाच्या खोट्या बातम्यांवर शक्ती कपूर यांचा संताप, म्हणाले आता कायदेशीर...

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिचे वडील, ७३ वर्षीय शक्ती कपूर (Shakti Kapoor) सध्या