'या' सहा देशी क्रीडा प्रकारांची खेलो इंडिया योजनेत निवड

नवी दिल्ली : भारताच्या अनेक भागात स्थानिक संस्कृती आणि परंपरेनुसार अनेक देशी क्रीडा प्रकार खेळले जातात. “क्रीडाक्षेत्र’ हा राज्याचा विषय असल्याने, देशातील अशा देशी खेळांना प्रोत्साहन देण्याची आणि अशा खेळांच्या विकासासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची प्राथमिक जबाबदारी, संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची आहे. राज्यांच्या या प्रयत्नांना केंद्र सरकार पाठबळ देते.


केंद्रीय क्रीडा मंत्रालय केंद्रीय क्षेत्रावरील एक योजना (Khelo India scheme) खेलो इंडिया- क्रीडा विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (खेलो इंडिया योजना) राबवत आहे. या अंतर्गत, एक उपक्रम, “ग्रामीण आणि देशी/ आदिवासी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन” अशा नावाने राबवला जातो. देशी खेळांना याअंतर्गत प्रोत्साहन दिले जाते. मल्लखांब, कल्लरीपयट्टू, गटका, थांग-था, योगासने आणि सीलबम अशा पारंपरिक देशी खेळांची यासाठी निवड करण्यात आली आहे. या खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण, उपकरण सहाय्य, प्रशिक्षकांची नेमणूक आणि शिष्यवृत्ती यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय, मल्लखांब, कल्लरीपयट्टू, गटका, थांग-था आणि योगासने हे खेळ, नुकत्याच हरियाणातील पंचकुला इथे झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतही समाविष्ट करण्यात आले होते.


अशी माहिती, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात दिली.

Comments
Add Comment

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने