अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ३.७८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

औरंगाबाद (हिं.स.) : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील सुमारे १,७०० गावांना बसला असून, सुमारे ३ लाख ७८ हजार ७५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे.


दरम्यान सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे झाले असून अजूनही अडीच लाख हेक्टरचे पंचनामे बाकी आहेत. तर तब्बल ६ लाख २१ हजार ६९४ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.


नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान


मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५,३३,३८४ शेतकरी बाधित झाले आहेत. तर २ लाख ९८ हजार ८६१.१७ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून १,५७० गावे बाधित झाली आहेत. त्या खालोखाल हिंगोली ८५,६०० शेतकरी बाधित झाले आहेत, तर ७६ हजार ७७१ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून ६२ गावे बाधित झाली आहेत.


तिसऱ्या क्रमांकावर परभणी असून १,५०० शेतकरी बाधित, १ हजार २०० हेक्टर जमिनीचे नुकसान, तर ३ गावे बाधित झाली आहेत. चौथ्या क्रमांकावर लातूरमध्ये ७७५ शेतकरी बाधित, १ हजार ६४०.५७ हेक्टर जमिनीचे नुकसान, ८ गावे बाधित झाली आहेत.


त्यापाठोपाठ जालन्यात ३७७ शेतकरी बाधित, २५५.७४ हेक्टर जमिनीचे नुकसान, तर एक गाव बाधित झाले आहे. बीडमध्ये ५८ शेतकरी बाधित, २६.८० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून एक गाव बाधित झाले आहे. या जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद आणि उस्मानाबादमधील नुकसान नगण्य असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

Comments
Add Comment

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

Defamation on social media :सोशल मीडियावर बदनामी करणे महागात पडणार, कायद्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social media platforms) वापर करून पुराव्यांविना केली जाणारी बदनामी (Defamation) आणि त्यातून

Nashik TCS Case : “धर्मांतरासाठी दबाव, बुरखा-नमाजचे प्रशिक्षण”, सरकारी वकिलांनी केले अनेक धक्कादायक दावे

- निदा खानला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी नाशिक : नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात

Nashik TCS Case : निदा खानच्या आजच्या पहिल्या सुनावणीत न्यायालयात घडलं ?

Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली. गेले 25 दिवस निदा खान

Bengaluru-Nagpur Flight : नागपुरातील मुसळधार पावसाचा विमानसेवेवर परिणाम; इंडिगोचे बेंगळुरू-नागपूर विमान रायपूरला वळवले

नागपूर : नागपूर शहरात गुरुवारी (७ मे) दुपारनंतर अचानक झालेल्या मुसळधार पावसाने आणि वेगवान वादळी वाऱ्यांनी जनजीवन

Sanjay Shirsat Criticized Imtiaz Jaleel : “निदा खानला इम्तियाज जलील यांचा आश्रय”; मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल

मुंबई : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील