केंद्राकडून ध्वज संहितेमध्ये बदल; आता दिवसा-रात्री देखील तिरंगा फडकवता येणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशाच्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे आता दिवसा आणि रात्री देखील तिरंगा फडकाविता येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने १३ ते १५ ऑगस्ट या काळामध्ये ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे.


राष्ट्रध्वज वंदनाबाबतचे नियम हे भारताची ‘ध्वज संहिता-२००२’ आणि ‘राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा-१९७१’ अंतर्गत निश्चित करण्यात आले आहेत. आता २००२ च्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता पॉलिस्टरपासून तयार करण्यात आलेले तसेच मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करता येईल. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना याबाबतचे पत्र पाठविले आहे.


याआधी केवळ सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वज फडकाविता येत असे तसेच मशीनवर तयार करण्यात आलेले तसेच पॉलिस्टरचे राष्ट्रध्वजाला परवानगी दिली जात नसे.

Comments
Add Comment

ट्रम्प यांना पुन्हा आली भारताची आठवण, म्हणाले मोदी माझे चांगले मित्र

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी म्हणाले की त्यांना पूर्ण विश्वास आहे की

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे

शिक्षक भरतीवेळी महाविद्यालयाच्या आवारात दिसले महाकाय अजगर

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही

२०४० मध्ये चंद्रावर भारतीय पाऊल पडणार

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांचा विश्वास नवी दिल्ली : इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी चांद्रयान ४,

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव