संजय पांडे यांना ९ दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली (हिं.स.) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) फोन टॅपिंग प्रकरणात त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी त्यांना ९ दिवसांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे.


यापूर्वी सीबीआयने १८ जुलै रोजी संजय पांडे यांची चौकशी केली होती. ईडीने संजय पांडे यांना अटक करण्यापूर्वी त्याच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. याशिवाय सीबीआयनेही या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे. या प्रकरणात माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याशिवाय इतरही अनेक हायप्रोफाईल लोकांची नावे समोर आली आहेत. या यादीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णा यांच्या नावाचाही समावेश आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी संजय पांडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संचालक होते.


यानंतर एप्रिल २०२१ मध्ये उद्धव ठाकरे सरकारने त्यांना महाराष्ट्राच्या डीजीपी पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली, मात्र रजनीश सेठ यांना महाराष्ट्राचे डीजीपी बनवल्यानंतर ही जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. नंतर त्यांना मुंबईचे पोलिस आयुक्त करण्यात आले. १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय पांडे ३० जून रोजी पोलिस सेवेतून निवृत्त झाले आहेत. २०१० आणि २०१५ दरम्यान, iSec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला एनएसईच्या सर्व्हर आणि सिस्टम सुरक्षेशी संबंधित एक कॉंट्रॅक्ट देण्यात आले होते. या प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडी संजय पांडे यांची चौकशी करत आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत ईडी त्याची चौकशी करत आहे.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत