संजय पांडे यांना ९ दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली (हिं.स.) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) फोन टॅपिंग प्रकरणात त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी त्यांना ९ दिवसांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे.


यापूर्वी सीबीआयने १८ जुलै रोजी संजय पांडे यांची चौकशी केली होती. ईडीने संजय पांडे यांना अटक करण्यापूर्वी त्याच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. याशिवाय सीबीआयनेही या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे. या प्रकरणात माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याशिवाय इतरही अनेक हायप्रोफाईल लोकांची नावे समोर आली आहेत. या यादीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णा यांच्या नावाचाही समावेश आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी संजय पांडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संचालक होते.


यानंतर एप्रिल २०२१ मध्ये उद्धव ठाकरे सरकारने त्यांना महाराष्ट्राच्या डीजीपी पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली, मात्र रजनीश सेठ यांना महाराष्ट्राचे डीजीपी बनवल्यानंतर ही जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. नंतर त्यांना मुंबईचे पोलिस आयुक्त करण्यात आले. १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय पांडे ३० जून रोजी पोलिस सेवेतून निवृत्त झाले आहेत. २०१० आणि २०१५ दरम्यान, iSec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला एनएसईच्या सर्व्हर आणि सिस्टम सुरक्षेशी संबंधित एक कॉंट्रॅक्ट देण्यात आले होते. या प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडी संजय पांडे यांची चौकशी करत आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत ईडी त्याची चौकशी करत आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला