मुंबईतील रायगड सहकारी बँकेला आरबीआयचा दणका

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मुंबईतील रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लागू केले असून, या निर्बंधामुळे ठेवीदारांना खात्यातून केवळ १५ हजार रुपयेच काढता येणार आहेत.


बँकेच्या रोख मूल्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी बँकेवर निर्बंध आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. लादण्यात आलेले हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असतील असे आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.


निर्बंध लागू करण्यात येत असल्याने बँकेतील बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्याच्या ठेवीधारांना खात्यातून केवळ १५ हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यापेक्षा अधिकची रक्कम ठेवीदारांना काढण्यावर निर्बंध असतील असेही आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बँकेवर फक्त निर्बंध लावण्यात आले असून त्यांचा बँकिंग परवाना रद्द केलेला नसल्याचेही आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. तसेच जोपर्यंत बँकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत संबंधित बँक निर्बंधांसह दैनंदिन कामकाज करू शकणार आहेत.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.