मुंबईतील रायगड सहकारी बँकेला आरबीआयचा दणका

Share

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मुंबईतील रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लागू केले असून, या निर्बंधामुळे ठेवीदारांना खात्यातून केवळ १५ हजार रुपयेच काढता येणार आहेत.

बँकेच्या रोख मूल्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी बँकेवर निर्बंध आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. लादण्यात आलेले हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असतील असे आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

निर्बंध लागू करण्यात येत असल्याने बँकेतील बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्याच्या ठेवीधारांना खात्यातून केवळ १५ हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यापेक्षा अधिकची रक्कम ठेवीदारांना काढण्यावर निर्बंध असतील असेही आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बँकेवर फक्त निर्बंध लावण्यात आले असून त्यांचा बँकिंग परवाना रद्द केलेला नसल्याचेही आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. तसेच जोपर्यंत बँकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत संबंधित बँक निर्बंधांसह दैनंदिन कामकाज करू शकणार आहेत.

Recent Posts

Pahalgam Terror Attack: प्रविण तरडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, पहलगाम हल्ल्यात गमावला जीवलग मित्र

पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…

8 minutes ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताची घुसखोरी विरोधात कठोर मोहीम!

चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…

16 minutes ago

पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला कशी देणार प्रतिक्रिया, गुरुवारी बिहारमध्ये कळणार

दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…

34 minutes ago

१० कोटींचा बँक घोटाळा! वरिष्ठ मॅनेजर, उद्योजक व एजंटला ५ वर्षांची शिक्षा

मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…

46 minutes ago

Sachin Tendulkar: “हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…

1 hour ago

Mumbai BMW hit and run case : गाडी थांबवता आली असती, पण माणुसकी हरवली…

वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…

1 hour ago