मुंबईतील रायगड सहकारी बँकेला आरबीआयचा दणका

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मुंबईतील रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लागू केले असून, या निर्बंधामुळे ठेवीदारांना खात्यातून केवळ १५ हजार रुपयेच काढता येणार आहेत.


बँकेच्या रोख मूल्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी बँकेवर निर्बंध आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. लादण्यात आलेले हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असतील असे आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.


निर्बंध लागू करण्यात येत असल्याने बँकेतील बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्याच्या ठेवीधारांना खात्यातून केवळ १५ हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यापेक्षा अधिकची रक्कम ठेवीदारांना काढण्यावर निर्बंध असतील असेही आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बँकेवर फक्त निर्बंध लावण्यात आले असून त्यांचा बँकिंग परवाना रद्द केलेला नसल्याचेही आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. तसेच जोपर्यंत बँकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत संबंधित बँक निर्बंधांसह दैनंदिन कामकाज करू शकणार आहेत.

Comments
Add Comment

'डिजीटल अरेस्ट' दाखवून उद्योजकाकडून ५८ कोटी रुपये लुटले

मुंबई : मुंबईत उद्योजकाला 'डिजीटल अरेस्ट' दाखवून ५८ कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर प्रकरणी

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा

उद्योगांनी गरजा समजून योगदान द्यावे राज्य शासन विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विविध योजना आणि उपक्रम राबवित आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काय घ्यावी खबरदारी, घ्या जाणून

मुंबई : दिपावली सण साजरा करताना आनंदाबरोबरच सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दिवाळीच्या काळात घरगुती आग,

मुंबईतील डबेवाले सोमवारपासून सुट्टीवर

मुंबई : मुंबईतील ठिकठिकाणच्या कार्यालयांमध्ये वेळेवर जेवणाचे डबे पुरविणारे शेकडो डबेवाले येत्या २०

मागच्या दीपोत्सवात केली तक्रार, आता त्याच कार्यक्रमाचे करणार उद्घाटन...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मनसेच्यावतीने यंदाही छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दीपोत्सव साजरा करण्यात येणार असून

गर्दी नियमनासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार — सीएसटी, ठाणे, कल्याणसह ६ स्थानकांवर तात्पुरती बंदी

रायगड : दिवाळी आणि छठ पूजेसारख्या मोठ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी प्रवाशांची प्रचंड