धक्कादायक! मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न; पैशाच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या घटनेत ही व्यक्ती गंभीर जखमी झाली असल्याने त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयासमोर काल (१५ डिसेंबर) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रकाश सावंत असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.


प्रकाश सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर स्वत: च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले त्यावेळी तिथे उपस्थितीत असलेल्या लोकांनी धाव घेत त्यांना वाचवलं.
पण, तोपर्यंत प्रकाश सावंत हे ५०-६० टक्के भाजल्याची माहिती समोर आली आहे. सावंत यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण समोर आले आहे. वकिलांसोबत झालेल्या पैशाच्या वादातून त्यांनी स्वतःला जाळून घेतले असल्याचे त्यांनी आत्मदहनाच्या आधी एका नोटमध्ये लिहिले होते.





प्रकाश सावंत यांनी आत्महत्या नोटमध्ये काय लिहले?


प्रकाश सावंत हे कणकवलीतील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांनी त्यांच्या नोटमध्ये लिहिले की, कणकवलीचे तहसीलदार रमेश पवार आणि वकील स्नेहा हरणे यांनी ५ ते ६ वेळा हक्कसोड लिहून घेतले, त्याबद्दल कित्येक तक्रारी केल्या. तरी लक्ष दिले गेले नाही. त्यानंतर वकिल स्नेहा हरणे यांना सन २०२१ रोजी ६ लाख ८० हजार इतकी रक्कम या केससाठी दिलेली आहे, मात्र त्या सदरची रक्कम परत करत नाहीत. या विरोधात प्रकाश सावंत यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा इथे वकील स्नेहा हरणे यांच्या विरुद्ध तक्रार केली होती.


त्यावेळी जोशी नावाचे वकिल न्यायाधीश होते. त्यांनी सुद्धा वकिल स्नेहा हरणे यांना वॉर्निंग दिली होती आणि सांगितलं होतं की, प्रकाश सावंत यांचे सगळे पैसे व्याजासह द्यावे. तरी स्नेहा हरणे वकील यांनी फक्त ६ लाख इतकी रक्कम परत केली. मात्र ८० हजार ही व्याज रक्कम अजून दिलेली नाही. याबाबतची तक्रार बार कॉऊन्सील येथील रणपिसे सर यांच्याकडे १० ऑक्टोबर, २०२३ रोजीपासून आतापर्यंत ५ ते ६ वेळा केली आहे. मात्र ते सुद्धा लक्ष देत नाहीत. त्यानंतर याबाबतची तक्रार दिल्ली मंत्रालय इथे सुद्धा ५ वेळा केल्यावर, दिल्ली मंत्रालयाने कणकवली पोलिसांना या विषयी सुचित केले. मात्र कणकवली पोलीसही याबाबत कोणतीही कार्यवाही करीत नाहीत.


राज्य सरकार आणि दिल्ली मंत्रालय येथे मी अनेक वेळा तक्रार दिली. नरडवे महमदवाडी प्रकल्पामुळे आमची जागा कणकवली सरकार यांनी घेतली आहे. जर या जागा मोबदला आम्हाला न मिळाल्यास कोणतीही अघटित घटना घडल्यास त्यास आमची कोणतीही जबाबदार नसेल.

Comments
Add Comment

heatstroke in Maharashtra : महाराष्ट्रात उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात सुर्याने रौद्ररूप धारण केले असून मार्च महिन्यातच पारा प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. वाढत्या

Cab Drivers Strike : शनिवारपासून कॅब चालकांचा संप

मुंबई : कॅब व रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांवर गुरूवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरांशी होणाऱ्या बैठकीत

Mumbai : मुंबईत झाडांच्या फांद्यांची होणार शास्त्रोक्त छाटणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धोकेदायक ठरू शकणाऱ्या झाडांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी शास्रोक्त पद्धतीने छाटणी कशी

BMC CBSE 10th Class Result : महानगरपालिका सीबीएसई मंडळाच्या दहावीचा निकाल ९२.८९ टक्के

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमांकनाचा तीढा सुटणार

 उच्चस्तरीय समिती गठीत; बाह्य सीमा निश्चित करून सरकारला शिफारशी करणार मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या

Adv. Ashish Shelar : आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा - माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

 क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे मुंबई : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2023