'संजय राऊतांनी आधी आजारपणातून ठणठणीत बरे व्हावे आणि मग उबाठाची वाट लावावी'; मंत्री संजय शिरसाटांचा खोचक टोला

छत्रपती संभाजीनगर: आगामी निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे. आज (मंगळवारी) दुपारी शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार असून, यासाठी आपण स्वतः भाजप कार्यालयात जाणार असल्याचे राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.



महायुतीचा 'विनिंग फॉर्म्युला'


युतीच्या बैठकीबाबत माहिती देताना शिरसाट म्हणाले की, "आज भाजप कार्यालयात संयुक्त बैठक होणार आहे. महायुतीला मिळालेल्या मताचा अनादर होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे अहंकाराचा प्रश्न न करता पहिल्या फेरीच्या बोलणीसाठी मी स्वतः भाजप कार्यालयात जाणार आहे." यावेळी त्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला देखील स्पष्ट केला. "ज्या जागा ज्या पक्षांनी जिंकल्या, त्या जागा त्यांना मिळतील. ज्या मतदारसंघात ज्यांचा आमदार आहे, त्यांना झुकते माप दिले पाहिजे, असा आमचा फॉर्म्युला आहे. शिवसेना युतीत जास्त जागा लढवणार असून, गेल्या निवडणुकीत आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो," असे त्यांनी नमूद केले.



'संजय राऊतांनी आधी तब्येत जपावी'


खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना शिरसाट यांनी अत्यंत खोचक शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, "संजय राऊत जोपर्यंत निगेटिव्ह बोलत नाहीत, तोपर्यंत त्यांना जेवण जात नाही. त्यांनी आधी आपल्या आजारपणातून ठणठणीत बरे व्हावे, तब्येतीची काळजी घ्यावी आणि मग उरल्यासुरल्या 'उबाठा'ची वाट लावावी. अमित शाहांचे काय करायचे ते आमचा पक्ष बघेल."



मुंबई महापालिका आणि मराठी माणूस


मुंबईतील 'ठाकरे ब्रँड' आणि पोस्टर्सवर बोलताना शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणाऱ्यांनी मराठी माणसासाठी बोलू नये. तुम्ही बिल्डरच्या नादी लागून मराठी माणसाला बेघर केले. मुंबईला 'खड्ड्यांचे शहर' बनवले. महापालिका म्हणजे तुम्ही व्यवसाय आणि उत्पन्नाचे साधन म्हणून पाहता का?" असा सवाल त्यांनी केला. तसेच, महायुती पुन्हा मराठी माणसाला मुंबईत आणण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



विरोधकांवर चौफेर फटकेबाजी


* रोहित पवार: "हे सर्व विद्वान आहेत. पण निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार म्हणजे आचारसंहिता लागणार, हे शेंबड्या पोरालाही कळते," अशा शब्दांत शिरसाटांनी रोहित पवारांची खिल्ली उडवली.
* सुप्रिया सुळे: सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएम (EVM) घोटाळा नाही हे मान्य केले, हे एक परिवर्तनच आहे, असे शिरसाट म्हणाले.
* महाविकास आघाडी: काँग्रेसने 'उबाठा' सोबत न जाण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुंबईत झालीच तर मनसे आणि उबाठा यांची युती होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) कुठे जातील, हे सांगता येत नाही, असे भाकीत त्यांनी वर्तवले.



पुणे-चिंचवडमध्ये युती नाही?


पुणे आणि चिंचवडमध्ये युती होणार नाही, हे जाहीर असल्याचे सांगत, अजित पवार काय करत आहेत याची आपल्याला कल्पना नसल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. तसेच, एकनाथ शिंदे यांच्यावर भाकरी फिरवण्याचा किंवा निर्णय घेण्याचा सर्वाधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Mumbai Crime : हायप्रोफाइल टॉवरमध्ये सुरू होता ड्रग्जचा काळाबाजार; उग्र वासामुळे पोलिसांनी टाकला छापा, मैत्रिणीसह तिघे ताब्यात...

Crime News : दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील हायप्रोफाइल यास्मीन टॉवरमध्ये सुरू असलेला ड्रग्जचा मोठा रॅकेट मुंबई

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे.

मुंबईसह महत्त्वाच्या शहरांत मिळणार गरमागरम ‘मत्स्य पाव’- मंत्री नितेश राणे

 मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; रोजगारनिर्मितीसाठी राबवणार मोबाईल फूड व्हॅन योजना मुंबई : राज्यातील

लालपरीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ‘पालक अधिकारी’ नेमणार;  मंत्री प्रताप सरनाईक

 मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; प्रत्येक आगाराला उत्पन्नाचे टार्गेट देणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग