मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी आणि जाहिरातबाजीवर खर्च करू नये, त्याऐवजी सामाजिक, विधायक उपक्रमातून योगदान द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ५ वर्षे उत्तम कार्यभार सांभाळला. तर, गेल्या महिन्यापर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून संपर्ण राज्य हलवले. सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत. राज्यातील सत्तांतर घडवून महाविकास आघाडीची सत्ता घालविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे, गावखेड्यातील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ट्विट करत, भाजपच्या लक्षावधी कार्यकर्त्यांसाठी ते एक प्रेरणा आहेत, असे म्हटले होते. त्यामुळे, फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून मोठी बॅनरबाजी आणि जाहिरातबाजी करण्यात येते. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असतो. मात्र, आता भाजपकडून कार्यकर्त्यांना बॅनरबाजी आणि जाहिरातबाजीवर खर्च करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
फडणवीस यांच्या वाढदिनी वर्तमानपत्रातून जाहिराती, बॅनरबाजी किंवा टीव्ही माध्यमातूनही जाहिरातबाजी न करण्याचे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे. भाजपचे कार्यालय सचिव मुकूंद कुलकर्णी यांनी यासंदर्भातील पत्रकच जारी केले आहे. तर, भाजप नेते आणि पदाधिकारी यांनी या खर्चाला फाटा देत सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…