रायगड जिल्ह्यातील निकृष्ट दर्जाच्या गणवेश वाटपाचे प्रकरण विधानसभेत गाजणार

नरेश कोळंबे


कर्जत (वार्ताहर) : महाराष्ट्र शासनाकडून जिल्ह्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जातात. सदरचे गणवेष शिवून घेण्यासाठी सर्वशिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर अनुदान दिले जात असते.


मात्र रायगड जिल्ह्यात या प्रक्रियेत अनागोंदी झाले बाबतची प्रकरणे समोर आल्यानंतर सम्यक विद्यार्थी आंदोलनचे वतीने प्रश्न मिडियामार्फत लावुन धरला होता. आणि त्याची चौकशी सुदधा सुरू होती. त्याची दखल घेत विधानसभेत प्रश्न उपस्थित करणेत आला आहे आणि त्यानुसार जिल्हा शिक्षणाधिकारी यांना अहवाल सादर करणेचा आदेश देखील देण्यात आला आहे.

रायगड जिल्हा परिषद मधील अनेक शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक ह्यांना विचारात न घेता गेल्यावर्षी परस्पर गणवेशाचे वाटप करण्यात आले होते. आलेले गणवेष नक्की कोणाकडून आले आहेत ह्याचे उत्तर कुठल्याही मुख्याध्यापक , शिक्षक किंवा केंद्रप्रमुख ह्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे ह्या गणवेष वाटपात घोटाळा झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे ह्या गोष्टीला उजेडात आणण्यात आले.


या गणवेष वाटपात झालेल्या घोटाळ्यातील सर्व दोषी ना शिक्षा व्हावी.या चौकशी दरम्यान पुन्हा सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे आवाहन करण्यात येते की, अहवाल सादर करणेसाठी कुठल्याही अधिकारी व मुख्याध्यापक, शिक्षक वर्गाने कुठलेही खोटे जबाब व कागदपत्रे तयार करू नये अन्यथा सर्वांच्या वर कारवाई होईल. -अँड. कैलास मोरे (सम्यक विद्यार्थी आंदोलन)

Comments
Add Comment

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,