राज्यात २३८२ कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १५५२१ ॲक्टिव्ह रुग्ण

  90

मुंबई (हिं.स.) : राज्यात आज २३८२ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर आठ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज रोजी एकूण १५५२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


आज २८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७८,५३,६६१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९६% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२५,९९,५२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,१७,२०५ (०९.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


राज्यात बी ए.४ आणि बी ए.५ व्हेरीयंटचे ३५ रुग्ण तर बी ए.२.७५ चे ८ रुग्ण


बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी ए. ४ चे ४ तर बी ए.५ चे ३१ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बीए.२.७५ व्हेरीयंटचे देखील ८ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. या नमुन्यांची तपासणी पुणे आणि मुंबई येथील इन्साकॉग अंतर्गत प्रयोगशाळांमध्ये करण्यात आले आहे. हे सर्व नमुने दिनांक ३१ मे ते ३० जून २०२२ या काळातील आहेत. या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ११३ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या ४० झाली आहे.


जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५


पुणे -६५, मुंबई -३३, नागपूर ठाणे पालघर - प्रत्येकी ४, रायगड - ३


जिल्हा निहाय बी ए.२.७५ 


पुणे -२०, नागपूर -१४, अकोला - ४ , ठाणे यवतमाळ - प्रत्येकी १

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई