Categories: पालघर

वैतरणा नदीपात्रात अडकलेले दहा कामगार सुखरूप

Share

बोईसर (वार्ताहर) : दहिसर-बहाडोली गावादरम्यान वैतरणा नदीपात्रात मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी पुलाच्या बांधकामाचे काम करणाऱ्या दहा कामगारांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास पाणी पातळीत घट झाल्याने जी आर कंपनीच्या बोटीतून एनडीआरएफचे जवान बार्जपर्यंत पोहोचले होते. बचाव अभियान पूर्ण झाल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. नदीपात्राच्या पाणी पातळीत अचानक वाढ होऊन बार्जचा नांगर तुटल्याने बार्जवरील दहा कामगार नदीपात्रात अडकले होते.

मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी दहिसर बहाडोली गावादरम्यान वैतरणा नदीपात्रात पुलाच्या बांधकामासाठी पिलर टाकण्याचे काम सुरू होते. नदी मध्यभागी पुलाच्या पिलर तयार करण्यासाठी बार्जवर दहा कामगार काम करीत होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्याने बार्जचा नांगर तुटल्याने एका नांगराच्या आधारावर बार्ज नदी पात्रात हेलकावे खाऊ लागला होता. बार्जवर दहा कामगार असल्याने जी आर कंपनीचे धाबे दणाणले होते. जी आर कंपनीकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला संपर्क साधल्यानंतर बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली होती. एनडीआरएफचे पथक, महसूल आणि पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

मुसळधार पाऊस आणि रात्रीच्या अंधारात बचाव कार्याला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्यात अपयश आले होते. कोस्ट गार्डला संपर्क साधण्यात आला होता. परंतु खराब हवामानामुळे बचावकार्य रात्री बारा वाजताच्या सुमारास थांबविण्यात आले होते.

गुरुवारी सकाळी सात वाजता पुन्हा बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. जी आर कंपनीच्या बोटीतून एनडीआरएफचे जवान वैतरणा नदी पात्राच्या मध्यभागी असलेल्या बार्जपर्यंत पोहोचले. सकाळी आठ वाजेपर्यंत बार्जवर अडकलेल्या दहा कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर नदीपात्राबाहेर कामगारांमध्ये भीतीने काफरे सुटले होते. कामगारांना सुखरूप बाहेर काढल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल आणि पोलीस प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, उपविभागीय अधिकारी धनाजी तोरसकर, तहसीलदार, मंडळ अधिकारी, पोलीस कर्मचारी बचाव कार्यादरम्यान घटनास्थळी उपस्थित होते.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

8 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago