अतिवृष्टीमुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पाचवी आणि आठवीच्या परीक्षेला जे ग्रहण लागले आहे ते मात्र जाण्यास तयार होत नसल्याचे चित्र आहे, कोरोना महामारी नियंत्रणात आल्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते, सर्व तयारीदेखील झाली होती. मात्र राज्यात अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा वेळापत्रक कोलमडले.


राज्य परीक्षा परिषदेतर्फे २० जुलैला होणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ही परीक्षा आता ३१ जुलैला घेण्याचा निर्णय घेण्यात येणार असून, २० जुलैच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रच ३१ जुलैच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यभरातील ४८ हजार ८० शाळांमधील पाचवी व आठवीच्या एकूण सात लाख २१ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.


राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने दळण-वळणास येणाऱ्या अडचणी, विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता शिष्यवृत्ती परीक्षा २० ऐवजी ३१ जुलै (रविवार) घेण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेकडून कळविण्यात आले आहे. शिक्षण विभागाने सर्व तयारी केली होती; परंतु काही ठिकाणी पावसामुळे संपर्क ही करणे कठीण असल्याने आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा बदल करण्यात आला आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

Snehal Jadhav : मुंबईत 'मनसे'ला मोठा धक्का; स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण

पश्चिम रेल्वेचे प्रवासी-केंद्रित विकासाचे ऐतिहासिक वर्ष

२०२५ मुंबई : २०२५ हे वर्ष पश्चिम रेल्वेसाठी एक ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी वर्ष म्हणून उदयास आले. हे वर्ष

राष्ट्रपतींचा 'आयएनएस वाघशीर'मधून प्रवास

मुंबई : भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी अरबी

पश्चिम रेल्वेवर आजपासून विविध मार्गांवर रेल्वे ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी १८ जानेवारी २०२६

आरे ते कफ परेड मेट्रो रात्रभर धावणार

बुधवारी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी