इगतपुरी-कसारा टनेल प्रस्तावाच्या सर्वेक्षणाला अंतिम मंजुरी

Share

नाशिक (प्रतिनिधी) : मुंबई-नाशिक दरम्यानचा प्रवास जलदगतीने व्हावा यासाठी खा. गोडसे यांच्याकडून सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. मुंबई ते नाशिक दरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना अडचणींचा ठरणाऱ्या इगतपुरी-कसारा दरम्यानच्या लोहमार्गावर १:१०० ग्रेडीयंट क्षमतेचा टनेल व्हावा यासाठीच्या प्रस्तावास रेल्वे बोर्डाने जागा सर्वेक्षणाला अंतिम मान्यता दिली असून याकामी ६४ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

इगतपुरी – कसारा हे अंतर १६ कि.मी.चे असून या दरम्यान १ : १०० ग्रेडीयंटचा टनेल झाल्यास प्रवाशांचा वेळ आणि बॅकरवर होणारा खर्चही वाचणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मध्य रेल्वे मार्गावरून ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांची आणि प्रवाशांची संख्या मोठी आहे. या सर्व रेल्वेगाड्यांना इगतपुरी ते कसारा या दरम्यानच्या लोहमार्गावरूनच धावावे लागते. इगतपुरी ते कसारा हे १६ कि.मीचे अंतर असून या दरम्यानच्या घाट परिसरांत पूर्वीपासून असलेले टनेल कमी व्यासाचे आहेत. परिणामी या दरम्यानच्या घाट परिसरात सतत रेल्वेगाड्या थांबवाव्या लागत असल्याने प्रवासास विलंब होतो. कसारा-इगतपुरी दरम्यान १.३७ एेवजी १.१०० ग्रेडीयंट क्षमतेच्या मध्ये टनेल व्हावा, अशी मागणी खा. गोडसे केंद्राकडे करत होते. टनेल उभारणी झाल्यावर मुंबईहून कसाऱ्यापर्यंत धावणारी लोकल नाशिकपर्यंत धावणे शक्य होणार आहे.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

23 minutes ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

53 minutes ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

1 hour ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

1 hour ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

2 hours ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

3 hours ago