'खडकवासला' धरणातून लवकरच वीजनिर्मिती

पुणे (हिं.स.) : खडकवासला धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चार ते पाच महिन्यांत वीजनिर्मिती सुरू होईल. खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात शेतीसाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर १.२ मेगावॉट वीजनिर्मिती करणार आहे. यामुळे आठशे ते हजार घरांना पुरेल, एवढी वीजनिर्मिती यातून होणार आहे.


पानशेत धरण फुटीच्या दुर्घटनेत पुणेकरांचे अतोनात नुकसान झाले, त्यानंतर धरणांच्या सुरक्षिततेसाठी अनेक योजना राबविला. त्यापुढे एक पाऊल टाकत आता खडकवासला धरणातून वीजनिर्मितीचे काम हाती घेतले आहे. खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प २००६ मध्ये मंजूर झाला.


त्यानुसार या प्रकल्पात ६०० किलोवॉटच्या दोन जनित्रांद्वारे १.२ मेगावॉट वीजनिर्मिती करणार आहे. हे वीजनिर्मितीचे काम बीओटी तत्त्वावर एका कंपनीला दिले आहे.

Comments
Add Comment

Thane-CSMT : ठाणे ते सीएसएमटी प्रवास सुसाट! १५० कोटींच्या नव्या समांतर पुलामुळे 'शीव'ची कोंडी फुटणार; मार्ग कसा असेल?

मुंबई : मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शीव (Sion) परिसरातील प्रवाशांसाठी एक

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा