पुरामुळे पुलाचे बांधकाम कोसळले

  102

त्र्यंबकेश्वरसह तालुक्यात पावसाची संततधार सुरच !


सुनिल बोडके


वेळुंजे : त्र्यंबकेश्वरसह तालुक्याच्या ग्रामीण भागातील हरसूल परिसरात पावसाची संततधार सुरूच असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाने अनेक नद्यांना पूर आला असून शिरसगाव (हरसूल) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले असून पुलाचा स्लॅबदेखील कोसळण्याची शक्यता आहे. या पावसामुळे अपूर्ण असलेल्या या पुलामुळे १५ गावांचा संपर्क तुटला होता. या पुलावरून विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करून शाळा व घर गाठावे लागते. या पूल बांधकामाच्या ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचे पडसाद आता विद्यार्थ्यांनाही भोगावे लागत आहेत.


हरसूल परिसरात तसेच राज्यांच्या सीमावर्ती भागात सकाळपासूनच पावसाने संततधार सुरू ठेवल्याने काही तासांतच अनेक लहान- मोठ्या ओहळ, नाले,नद्यांना पूर आला होता. मात्र या पावसाने शेती कामाला मोठी चालना मिळाली असून शेतकरी या पावसातही भात अवनी करतांना दिसून आला.


या पावसामुळे शाळकरी मुले, शिक्षक वर्गाची पुरती तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. तसेच अनेक गावांचा संपर्क तुटल्याने विद्यार्थ्यांना मोठी कसरत करण्याची वेळ आली. त्यात हवा आणि जोरदार पाऊस होत असल्याने मानवी जीवनावरही याचा परिणाम दिसून आला. धो- धो बरसणाऱ्या पावसाने पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाले आहे.


त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव-मुरंबी रस्त्यावर नव्याने पुलाची उभारली करण्यात येत आहे. मागील आठवड्यात या पुलावर काही भागात स्लॅब टाकण्यात आला होता. तर काही ठिकाणी अजून प्रतीक्षेत आहे. मात्र हा पूल नदीच्या पात्रात असल्यामुळे संततधार पावसामुळे नदीला पूर आला असून बांधकाम साहित्य त्यात वाहून गेले आहे. ‘सर आली धावून, बांधकाम साहित्य गेले वाहून’ असे आता म्हणण्याची वेळ आली आहे.


विशेष म्हणजे शिरसगाव भागात दळणवळणाच्या दृष्टीने नव्याने उभारण्यात येत असलेला हा महत्वाचा पूल आहे. अनेक गावांना जोडणारा आणि वेळेची बचत करणारा हा पूल आहे. मात्र अधिकारी आणि ठेकेदार यांच्या आडमुठ्या धोरणामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाने भर पावसाळ्यात या पुलाचे काम करण्यात येत असल्याने नियंत्रण व गुणवत्तापूर्ण काम असेल का? याबद्दल शंका घेण्यात येत आहे. पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता व हलगर्जीपणा याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल