सिंधूचे मलेशिया ओपनमधील आव्हान संपुष्टात

  83

क्वालालम्पूर (वृत्तसंस्था) : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे मलेशिया ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या ताय त्झू यिंगने सिंधूला पराभूत करत स्पर्धेबाहेर केले. ५५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधू १३-२१, २१-१२, १२-२१ अशी पराभूत झाली.


मलेशिया ओपनमध्ये पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या फिट्टायापोर्न चायवानचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. सिंधूने फिट्टायापोर्न चायवानचा १९-२१, २१-९, २१-१४ असा पराभव केला होता. पण आता उपांत्यपूर्व फेरीत सिंधू पराभूत झाल्याने ती उपांत्य फेरीत पोहोचू शकलेली नाही. उपांत्यपूर्व फेरीच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात पहिल्या सेटमध्ये यिंगने दमदार खेळ दाखवला.


आधीपासून चांगले पॉइंट्स जमवत ती थेट १३-२१ अशा मोठ्या फरकाने जिंकली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने पुनरागमन केले आणि २१-१२ च्या फरकाने सिंधूने सेट जिंकला. त्यानंतर अखेरच्या आणि निर्णायक सेटकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले होते. हा सेट २१-१४ च्या फरकाने यिंगने जिंकत सामनाही नावे केला. हा सामना जिंकत यिंगने आगेकूच केली, तर सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सिंधूला याच यिंगने पराभूत केले होते. ज्यामुळे यिंगला रौप्यपदक मिळाले होते, तर सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर आताही यिंगमुळे सिंधूचे मलेशिया ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. आतापर्यंत सिंधू आणि यिंग यांच्यात झालेल्या सामन्यात यिंगचच पारडे जड राहिले असून तिने १६ सामने जिंकले असून सिंधूने केवळ ५ सामने जिंकले आहेत.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट