नैसर्गिक शेती परिषदेला रविवारी संबोधित करणार पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली (हिं.स) : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार १० जुलै सकाळी साडे अकरा वाजता नैसर्गिक शेती परिषदेला डिजिटल पद्धतीने संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांनी मार्च २०२२ मध्ये झालेल्या गुजरात पंचायत महासंमेलनात प्रत्येक गावातल्या कमीत कमी ७५ शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती आत्मसात करावी असे आवाहन केले होते.


पंतप्रधानांच्या याचं आवाहनाला प्रतिसाद देत सुरत जिल्ह्याने पुढाकार घेऊन तसेच अथक प्रयत्न करून पंतप्रधानाचे हे स्वप्न वास्तवात आणले. नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकरी वर्गाला प्रवृत्त करण्यासाठी सुरत शहराने शेतकरी संघटना, तलाठी, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी बँका, या क्षेत्राशी निगडीत भागीदार, शेती उद्योग आणि लोकप्रतिनिधी यांना एकत्र आणून त्यांना शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत करायला सांगीतले.


त्याचप्रमाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रापंचायती मधून कमीत कमी ७५ शेतकऱ्यांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देऊन नैसर्गिक शेतीसाठी करण्यासाठी प्रवृत्त केले. या शेतकऱ्यांना ९० वेगवेगळ्या समूहात प्रशिक्षण देण्यात आले अशाप्रकारे जिल्हयातून ४१,००० शेतकरी नैसर्गिक शेतीसाठी तयार झाले.


ही परिषद सुरत इथे आयोजित करण्यात आली असून या परिषदेत असे हजारो शेतकरी आणि भागिदार सहभागी होणार आहेत ज्यांनी नैसर्गिक शेती आत्मसात करून यशोगाथा लिहीली. या परिषदेला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित राहणार आहेत.

Comments
Add Comment

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा

राजस्थानच्या फतेहपूर-माउंट अबूमध्ये तापमान ४ अंश सेल्सिअस

नवी दिल्ली  : उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह ८ राज्यांमध्ये शनिवारी सकाळी कडाक्याच्या थंडीसह दाट