नैसर्गिक शेती परिषदेला रविवारी संबोधित करणार पंतप्रधान मोदी

  110

नवी दिल्ली (हिं.स) : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार १० जुलै सकाळी साडे अकरा वाजता नैसर्गिक शेती परिषदेला डिजिटल पद्धतीने संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांनी मार्च २०२२ मध्ये झालेल्या गुजरात पंचायत महासंमेलनात प्रत्येक गावातल्या कमीत कमी ७५ शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती आत्मसात करावी असे आवाहन केले होते.


पंतप्रधानांच्या याचं आवाहनाला प्रतिसाद देत सुरत जिल्ह्याने पुढाकार घेऊन तसेच अथक प्रयत्न करून पंतप्रधानाचे हे स्वप्न वास्तवात आणले. नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकरी वर्गाला प्रवृत्त करण्यासाठी सुरत शहराने शेतकरी संघटना, तलाठी, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी बँका, या क्षेत्राशी निगडीत भागीदार, शेती उद्योग आणि लोकप्रतिनिधी यांना एकत्र आणून त्यांना शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत करायला सांगीतले.


त्याचप्रमाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रापंचायती मधून कमीत कमी ७५ शेतकऱ्यांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देऊन नैसर्गिक शेतीसाठी करण्यासाठी प्रवृत्त केले. या शेतकऱ्यांना ९० वेगवेगळ्या समूहात प्रशिक्षण देण्यात आले अशाप्रकारे जिल्हयातून ४१,००० शेतकरी नैसर्गिक शेतीसाठी तयार झाले.


ही परिषद सुरत इथे आयोजित करण्यात आली असून या परिषदेत असे हजारो शेतकरी आणि भागिदार सहभागी होणार आहेत ज्यांनी नैसर्गिक शेती आत्मसात करून यशोगाथा लिहीली. या परिषदेला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित राहणार आहेत.

Comments
Add Comment

Jammu And Kashmir : उधमपूरमध्ये शोकांतिका; CRPFचे वाहन खोल दरीत कोसळले, दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बसंतगड परिसरात एक मोठा अपघात घडला आहे. केंद्रीय राखीव पोलिस

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

PM Modi : ट्रम्पच्या धमक्यांना मोदींचं एका वाक्यात उत्तर : "शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार"

अमेरिकेच्या ५०% टॅरिफवर मोदींचा ठाम पवित्रा नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा

११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनियाचा धोका

२० वर्षांपूर्वी जगभरात केला होता कहर नवी दिल्ली : सुमारे २० वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा हा विषाणू पुन्हा

Go Back To India...', आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या मुलीवर हल्ला

नवी दिल्ली: आयर्लंडच्या वॉटरफोर्ड शहरात ६ वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीवर एका किशोरवयीन टोळीने वर्णद्वेषी

अमेरिकेचा निर्णय दुर्दैवी आणि अन्यायकारक, ट्रम्प यांच्या आदेशानंतर भारताची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने