सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

  91

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ६.२२ वाजता काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली. याबाबत सोलापूर जिल्हा प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला आहे. मात्र भूकंपाची तीव्रता अतिशय कमी असल्याने कोणतीही हानी यामध्ये झाली नसल्याचे स्पष्टीकरण देखील प्रशासनाने दिले आहे.


कर्नाटकतील विजापूरपासून १० किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्रबिंदू आहे. त्याठिकाणी भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.


सोलापूर जिल्ह्यातील काही भागात आज सकाळी भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी साडे सहाच्या सुमारास हे भुकंपाचे धक्के जाणवल्याच्या माहिती नागरिकांनी दिली.


कर्नाटकात मागील काही दिवसांपासून सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वी विजयापुर येथील स्थानिक नागरिकांना देखील धक्के जाणवले होते. त्यावेळी प्रशासनाने भूकंपाचे धक्के नसून पावसामुळे भूगर्भीय हालचाली असल्याचे सांगितले होते. मात्र आज जाणवलेले धक्के हे भूकंपाचे असून विजयापूर पासून १० किलोमीटर अंतरावर भूकंप केंद्र असल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Comments
Add Comment

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची

बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार