सोलापूर (हिं.स.) : देशातील अतिरिक्त १० लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्यात यावी, ज्यामध्ये कच्ची साखर आणि बंदरावरील साखरेला प्राधान्य देण्यात यावे, या मागणीचे निवेदन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिले होते. त्यांनी निवेदनाची दखल घेत साखर निर्यातीवरील निर्बंध शिथिल करत २० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. या निर्णयाचा फायदा देशातील साखर कारखान्यांना व पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचे खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले.
यावर्षी देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. आगामी गळीत हंगामातही मोठ्या प्रमाणात साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. देशातील बहुतांशी साखर कारखान्यांकडे कच्ची आणि पक्की साखर पडून आहे. त्यांच्याकडे कच्च्या साखरेचा पाच लाख टनाचा साठा शिल्लक आहे. तर विविध बंदरांवर सुमारे २ लाख टन कच्ची साखर पडून आहे. मात्र निर्यातीवर निर्बंध आल्याने या साखरेचा दर्जा खालावण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचबरोबर दर ढासळून साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार होते.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…