Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना


ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल रोजी ‘जागतिक वसुंधरा दिन’ (Earth Day) साजरा केला जात असून ‘आमची ऊर्जा आमची वसुंधरा’ हे या वर्षीचे घोषवाक्य असले तरी वाढत पृथ्वीचे तापमान धोक्याची घंटा आहे. यामागे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढणे हे एक मुख्य कारण आहे. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रेस ऑक्साईड यासारख्या वायूंमुळे उष्णतेचा अडथळा होतो आणि त्यामुळे तापमानात वाढ, वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या आपत्तीच्या घटना वाढल्या आहेत. मुंबई, ठाणे यांसारख्या शहरी भागात या वर्षी तापमान ४० अंशांपर्यंत गेले. ऋतूंचा ठरलेला क्रम ढासळत चालल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) हिमनद्या वितळत आहेत, समुद्रसपाटी वाढते आहे आणि त्यामुळे किनारपट्टी भागांना धोका निर्माण झाला आहे. ओझोन थरही कमी होत आहे, जो पृथ्वीवर येणाऱ्या घातक किरणांपासून आपले रक्षण करतो. त्वचाविकार, डोळ्यांचे विकार हे याचे परिणाम आहेत.



पर्यावरण तज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांच्या मते, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ३०० पीपीएम असावे, सध्या ते ५०० पीपीएमपेक्षा जास्त झाले आहे. हे वाढलेले प्रमाण ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार ठरत आहे. यामुळे हिमनद्या वितळत आहेत, ओझोन थर कमी होत आहे व त्वचा विकार, मोतीबिंदूसारखे आजार वाढत आहेत.


लक्झरी जीवनशैली पर्यावरणविरोधी बनत चालली आहे. फ्रिज, एसी, औषध फवारण्या, विमानप्रवास यातून क्लोरोफ्लोरोकार्बन वायू बाहेर पडतो, जो ओझोन थर नष्ट करतो. त्यामुळे पृथ्वीवर अधिक प्रमाणात यूव्ही किरणे पोहोचतात. शहरी भागांमध्ये माणसागणिक वाहने आहेत. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड यांसारखे वायू हवेत मिसळून उष्मा वाढवत आहेत. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा न केल्यामुळे मिथेनसारखा वायू निर्माण होतो.


ऊर्जेला फक्त उपभोगाचे साधन न मानता तिचा योग्य सन्मान करावा. हवा तेवढाच आणि आवश्यक असेल तेव्हाच वापर करावा. वृक्षसंख्या वाढली की आपसुकच ऊर्जेचा वापर कमी होईल. आमचे प्रेम पारंपरिक ऊर्जेवर जास्त असून, वृक्षांवर कमी आहे. मात्र याचा विपरीत परिणाम पृथ्वीवर होऊन तापमान वाढत आहे.
- डॉ. नागेश टेकाळे, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ

Comments
Add Comment

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली

 Solapur Crime News: धक्कादायक! सोलापुरात 5 वर्षीय पुतण्याची काकाकडून हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरूर गावात एक मन सुन्न

Nagpur Conversion Case : नागपूरच्या दर्ग्यात महिलेचा विनयभंग आणि धर्मांतरासाठी सक्ती; ६ जणांवर गुन्हा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका दर्ग्यात घडलेल्या कथित सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली

MSME : MSME उद्योजकांसाठी मोफत हेल्पलाईन सुरू; एका कॉलवर मिळणार तज्ज्ञ मार्गदर्शन

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ

Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार, तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईतून (Mumbai) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एका तरुणीचा विनयभंग (Molestation)