औषधांची दरपत्रके तयार करा

  119

मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यात मुंबईत डेंग्यू, मलेरिया यांसारखे साथीचे आजार पसरतात. दरम्यान यंदा पावसाळा सुरू झाला असला तरी या आजारांवरील औषधांची दरपत्रके अद्यापही पालिका प्रशासनाने तयार केली नसल्याचा आरोप भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. लवकरात लवकर दरपत्रके काढावी यासाठी भाजपने पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.


प्रभाकर शिंदे म्हणाले की, औषध अनुसूची क्र. १ (२०२१-२३) मध्ये इंजेक्शन अँड सेरा वॅक्सीनमध्ये पोटदुखी, भूल देण्याचे, टाके घालताना भूल देण्याचे, दम्याचे, अंगावरील सूज कमी करण्याचे, स्टेरॉईडचे अॅलर्जीमध्ये काम करणारे, तापाचे औषध, उलटी थांबण्याचे, ॲटीबायोटीक, कुत्रा चावल्यानंतर लागणारे इमुनीग्लोबिलीन रक्तदाब वाढवण्यासाठी लागणारे औषध, आकडी थांबविणारे औषध असे गुणधर्म असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींचा एकूण ४७ बाबींमध्ये उल्लेख आहे. तसेच पावसाळ्यात थंडीतापाच्या पेशंटची संख्या झपाट्याने वाढते. यामध्ये डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यासारखे आजार होतात.


या सर्व आजारांवरील तापाच्या औषधाची दरपत्रके अजून झालेली नसून ऑपरेशन करताना भूल देणारी औषधेसुध्दा यामध्ये आहेत. तसेच जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून लागणारी सर्व प्रतिजैवके याचे दरपत्रक प्रसारीत करण्यात आलेले नाही. दम्यासाठी लागणारे महत्त्वाचे औषध याच बाबींमध्ये आहे. पावसाळ्यामध्ये जुलाब, उलट्या होऊन पोटदुखीचे गंभीर आजार होतात. त्यासाठी लागणारी सर्व औषधे यामध्ये आहेत, असे शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.