व्हीआयपी नंबरसाठी सोलापूरकरांनी केवळ तीन महिन्यांत मोजले १ कोटी ३ लाख रुपये

  103

सोलापूर (हिं.स) : आवडत्या व लकी क्रमांक घेण्यासाठी लोकांची पसंती दिसुन येत आहे. व्हीआयपी नंबरसाठी आरटीओकडे मोजलेल्या रकमेवरून हे स्पष्ट होते. मागील तीन महिन्यांत सोलापूरकरांनी चक्क एक कोटी तीन लाख आठ हजार मोजून व्हीआयपी नंबर घेतले आहे. यातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला चांगला महसूल मिळाला आहे.


कोरोना काळात व्हीआयपी नंबरसाठी असलेली मागणी बऱ्यापैकी घटली होती. मात्र या वर्षभरात या आवडत्या पसंतीच्या क्रमांकाना पुन्हा मागणी वाढली आहे. मार्च ते जुलै २०२२ पर्यंत दुचाकी तसेच चारचाकी गाड्यासाठी अधिक रक्कम मोजून व्हीआयपी नंबर घेण्यात आले. यासाठी पाच हजारापासून ३ लाखांपर्यंत सोलापूरकरांनी मोजली आहे.


व्हीआयपी नंबरसाठी एक आकडी अंकाला सर्वाधिक रक्कम आहे. त्यासाठी ३ लाख मोजावे लागतात. पण आवडत्या आणि लकी अंकासाठी लोक तयार असतात. हे आकडेवारीवरुन दिसून येते. त्यानंतर तीन शून्य आणि एक आकडा असणाऱ्या नंबरला अधिक मागणी आहे. त्याला दीड लाख मोजावे लागतात. त्यानंतर व्हीआयपी नंबरनुसार ७० हजार, ५० हजार, १५ हजार, ७५०० आणि ५ हजार रुपये मोजावे लागतात.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या