सिंधू, साईची विजयी सलामी

कुआला लुम्पुर (वृत्तसंस्था) : भारताची आघाडीचे बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि साई प्रणीत यांनी मलेशिया मास्टर्स सुपर ५०० स्पर्धेत विजयी सलामी दिली. सिंधूने पहिल्या सामन्यात चीनच्या बिंग झियाओचा पराभव केला, तर पुरुष एकेरीत साई प्रणीतने केविन कॉर्डन गौतेमालाला धूळ चारली.


२८ वर्षीय पी.व्ही. सिंधूने पहिल्या फेरीच्या सामन्यात चीनच्या बिंग झियाओचा २१-१३, १७-२१, २१-१५ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना इंडोनेशियाची नात कुसुमा वरदानी आणि चीनच्या जिंग यी मेनच्या विजेत्याशी होईल. पुरुष एकेरीत साई प्रणीतने विजयाने स्पर्धेची सुरुवात केली. त्याने पहिल्या फेरीत केविन कॉर्डन गौतेमालाचा २१-८, २१-९ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत साई प्रणीत चीनच्या ली शी फेंगशी खेळेल.


या विजयानंतर दोघांचे पराभव आणि विजयाचे अंतर ९-१० असे झाले आहे. म्हणजेच दोघांमध्ये आतापर्यंत १९ सामने झाले आहेत. यापैकी भारतीय खेळाडूने ९, तर चीनच्या खेळाडूने दहा जिंकले आहेत. इंडोनेशिया ओपनमध्ये झियाओने पहिल्या फेरीत सिंधूला पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला होता. पी.व्ही. सिंधूने यावर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनच्या रूपाने दोन सुपर ३०० खिताब जिंकले आहेत. सिंधूने सातत्याने वर्ल्ड टूर स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरी गाठली आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर