संपत्तीच्या वादातून अफगाण तरुणाची हत्या

नाशिक (हिं.स.) : नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील चिचोंडी एमआयडीसी परिसरात एका अफगाणी तरुणाची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ख्वाजा सय्यद जब चिस्ती असे त्याचे नाव असून तो मुळचा अफगाणीस्थानचा रहिवासी होता. ही हत्या संपत्तीच्या वादातून झाल्याची माहिती नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.


यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले की, अफगाणी नागरिक सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून त्यांच्या ड्रायव्हरने केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रॉपर्टी आणि पैशावरून अहमद चिश्ती यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


निर्वासित असल्यामुळे ते मालमत्ता खरेदी करू शकत नव्हते. त्यामुळे संशयितांच्या नावाने गाडी आणि मालमत्ता खरेदी केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुफी धर्मगुरु यांचा ड्राइव्हर आणि इतर तीन जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांचे पथक या फरार संशयितांचा शोध घेत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.