मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर अग्रेसर होईल – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर (हिं.स.) : माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले व यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बांबुपासून तयार करण्यात आलेला तिरंगा ध्वज भेट देत आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.


राज्यातील दीन, दुर्बल, शोषित, पिडीत, उपेक्षित, वंचित जनतेच्या समस्या मार्गी लावत राज्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी आपणास बळ लाभावे अशी प्रार्थना श्री सिध्दीविनायकाचरणी करत असल्याचे आ. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार घेवून महाराष्ट्राचे कल्याण करण्यासाठी निघालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण सर्वशक्तीनिशी असल्याचे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.


यावेळी झालेल्या चर्चेत चंद्रपूर जिल्हयातील विविध समस्या व प्रश्नांबाबत मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. याबाबत लवकरच आढावा घेत हे प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन