हॉटेलच्या बिलातील सर्व्हिस चार्जची सक्ती नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्जबाबत ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सोमवारी यासंबंधी निर्देश जारी केले आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आता खाण्याच्या बिलावर सेवा शुल्क आकारु शकत नाहीत, असा निर्देश प्राधिकरणाने जारी केला आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून शुल्क आकारत होते, त्यावर आता प्राधिकरणाने बंदी घातली आहे.


सीसीपीएने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ग्राहकाला सेवा शुल्क भरायचे आहे की नाही हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. आक्षेप असल्यास, ग्राहक हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडून सेवाशुल्क वसूल करण्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक १९१५ वर तक्रार करू शकतात. तसेच कोणत्याही हॉटेलने ते खाद्यपदार्थांच्या बिलात जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सेवा शुल्क आकारण्याबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सीसीपीएने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Comments
Add Comment

कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक निर्णय! महिला कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक पाळीची भरपगारी सुट्टी

बेंगळुरू : महिलांच्या आरोग्याचा व कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुसंवादाचा विचार करत कर्नाटक सरकारने एक ऐतिहासिक

Ai Education : भारत घेणार तंत्रज्ञानाची नवी झेप, तिसऱ्या इयत्तेपासून कॉम्प्युटर नव्हे, आता 'AI' चा धडा! कधीपासून शिकवलं जाणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : भारतातील शिक्षण क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा बदल लवकरच होणार आहे.

जगात २८ कोटी लोक नैराश्यात

 दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी ’जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना मानसिक

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०