हॉटेलच्या बिलातील सर्व्हिस चार्जची सक्ती नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्जबाबत ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सोमवारी यासंबंधी निर्देश जारी केले आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आता खाण्याच्या बिलावर सेवा शुल्क आकारु शकत नाहीत, असा निर्देश प्राधिकरणाने जारी केला आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून शुल्क आकारत होते, त्यावर आता प्राधिकरणाने बंदी घातली आहे.


सीसीपीएने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ग्राहकाला सेवा शुल्क भरायचे आहे की नाही हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. आक्षेप असल्यास, ग्राहक हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडून सेवाशुल्क वसूल करण्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक १९१५ वर तक्रार करू शकतात. तसेच कोणत्याही हॉटेलने ते खाद्यपदार्थांच्या बिलात जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सेवा शुल्क आकारण्याबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सीसीपीएने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली