लेकीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आई वडिलांनी केली आत्महत्या

सांगली : सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यातील राजेवाडीत ह्रदय पिळवणूक टाकणारी घटना घडली आहे. दोन वर्षीय चिमुकलीचा घशामध्ये घास अडकून मृत्यू झाला आहे. पोटच्या मुलीच्या मृत्यूची दु:ख सहन न झाल्याने नैराश्यातून मुलीच्या आई-वडिलांनी देखील आत्महत्या केली आहे. एकाच दोरीने गळफास घेऊन पती-पत्नीने आपली जीवनयात्रा संपवली. करन नाना हेगडे (वय २८) व शीतल करन हेगडे (वय २२) अशी मृतांची नावे आहेत.


हा प्रकार समजताच आटपाडी पोलीसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. यावेळी मृत करनजवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत बाळा आम्ही तुझ्याकडे येत आहे. तुझा मृत्यू आम्हाला असह्य होत असल्याने आम्ही आत्महत्या करीत आहोत. आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असा मजकूर लिहिला आहे.


जेवण करीत असताना घास गळ्यात अडकल्याने दोन वर्षाच्या मुलीचा चार दिवसापुर्वी मृत्यू झाला होता. या मुलीचा मृत्यू झाल्याने माता पिता अत्यंत दु:खी झाले होते. या दोघांनी गुरूवारी दुपारी राजेवाडी गावातील काळामळा येथे असलेल्या कानिफनाथ मंदिराच्या परिसरातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

Comments
Add Comment

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा

ठोंबरे आणि मिटकरींना पक्षातून 'दे धक्का', प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस

इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून

Sangli Bailgada Race : धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली! 'हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल' जोडीने सांगलीत मारले मैदान; पुढच्यावर्षी विजेत्याला थेट BMW कार मिळणार

सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल

तेजस लढाऊ विमानांसाठी मोठा करार!

भारत अमेरिकेकडून ११३ जीई इंजिन खरेदी करणार,  स्वदेशी जेट उत्पादनाला मिळणार चालना हैदराबाद : हिंदुस्तान

राज्यात तापमानाचा पारा घसरला! महाबळेश्वरपेक्षा जळगावात थंडी वाढली

मुंबई: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा