लेकीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आई वडिलांनी केली आत्महत्या

  80

सांगली : सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यातील राजेवाडीत ह्रदय पिळवणूक टाकणारी घटना घडली आहे. दोन वर्षीय चिमुकलीचा घशामध्ये घास अडकून मृत्यू झाला आहे. पोटच्या मुलीच्या मृत्यूची दु:ख सहन न झाल्याने नैराश्यातून मुलीच्या आई-वडिलांनी देखील आत्महत्या केली आहे. एकाच दोरीने गळफास घेऊन पती-पत्नीने आपली जीवनयात्रा संपवली. करन नाना हेगडे (वय २८) व शीतल करन हेगडे (वय २२) अशी मृतांची नावे आहेत.


हा प्रकार समजताच आटपाडी पोलीसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. यावेळी मृत करनजवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत बाळा आम्ही तुझ्याकडे येत आहे. तुझा मृत्यू आम्हाला असह्य होत असल्याने आम्ही आत्महत्या करीत आहोत. आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असा मजकूर लिहिला आहे.


जेवण करीत असताना घास गळ्यात अडकल्याने दोन वर्षाच्या मुलीचा चार दिवसापुर्वी मृत्यू झाला होता. या मुलीचा मृत्यू झाल्याने माता पिता अत्यंत दु:खी झाले होते. या दोघांनी गुरूवारी दुपारी राजेवाडी गावातील काळामळा येथे असलेल्या कानिफनाथ मंदिराच्या परिसरातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत