लेकीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आई वडिलांनी केली आत्महत्या

  90

सांगली : सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यातील राजेवाडीत ह्रदय पिळवणूक टाकणारी घटना घडली आहे. दोन वर्षीय चिमुकलीचा घशामध्ये घास अडकून मृत्यू झाला आहे. पोटच्या मुलीच्या मृत्यूची दु:ख सहन न झाल्याने नैराश्यातून मुलीच्या आई-वडिलांनी देखील आत्महत्या केली आहे. एकाच दोरीने गळफास घेऊन पती-पत्नीने आपली जीवनयात्रा संपवली. करन नाना हेगडे (वय २८) व शीतल करन हेगडे (वय २२) अशी मृतांची नावे आहेत.


हा प्रकार समजताच आटपाडी पोलीसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. यावेळी मृत करनजवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत बाळा आम्ही तुझ्याकडे येत आहे. तुझा मृत्यू आम्हाला असह्य होत असल्याने आम्ही आत्महत्या करीत आहोत. आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असा मजकूर लिहिला आहे.


जेवण करीत असताना घास गळ्यात अडकल्याने दोन वर्षाच्या मुलीचा चार दिवसापुर्वी मृत्यू झाला होता. या मुलीचा मृत्यू झाल्याने माता पिता अत्यंत दु:खी झाले होते. या दोघांनी गुरूवारी दुपारी राजेवाडी गावातील काळामळा येथे असलेल्या कानिफनाथ मंदिराच्या परिसरातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

Comments
Add Comment

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी 'एआय'चा वापर

रायगड (प्रतिनिधी): गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात. त्यामुळे

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही