विठ्ठलाचे दर्शन आजपासून २४ तास, दररोज १ लाख भाविकांना मिळणार दर्शन

  64

सोलापूर (हिं.स.) : आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रखुमाईचे दर्शन मिळावे यासाठी आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत दर्शन २४ तास चालणार आहे. दररोज १ लाखांहून अधिक भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने दर्शन रांगेची उभारणी झाली आहे.


कोरोनापश्चात दोन वर्षांनी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी यंदा विक्रमी संख्येने वारकरी येतील अशी अपेक्षा आहे. त्याअनुषंगाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना सुविधा पुरवण्याचे काम पूर्ण केले आहे.


आषाढीसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना देवाचे दर्शन मिळावे यासाठी यात्रा काळात १५ दिवस देवाचे दर्शन २४ तास सुरू राहते. त्यामुळे देवाचा पलंग काढून ठेवला जातो. देवाच्या पाठीशी उशा ठेवून त्याला आधार दिला जातो. यंदा १ जुलै पासून १५ जुलैपर्यंत देवाचे दर्शन २४ तास चालू राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.


दर्शन रांगेत पावसाची शक्यता लक्षात घेऊन कायमस्वरूपी ४ आणि तात्पुरती ६ असे एकूण १० पत्राशेड उभे करण्यात आले आहेत. गोपाळपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत दर्शन रांगेसाठी लाकडी बॅरिकेड्स उभा केले आहेत. त्यावर आच्छादन टाकण्यात आले आहे. दर्शन रांगेत पत्राशेड जवळ दोन ठिकाणी अन्नदान, जागोजागी जारमधील पाणीपुरवठा, चहाची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही पुदलवाड यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी 'एआय'चा वापर

रायगड (प्रतिनिधी): गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात. त्यामुळे

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही