विठ्ठलाचे दर्शन आजपासून २४ तास, दररोज १ लाख भाविकांना मिळणार दर्शन

  55

सोलापूर (हिं.स.) : आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रखुमाईचे दर्शन मिळावे यासाठी आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत दर्शन २४ तास चालणार आहे. दररोज १ लाखांहून अधिक भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने दर्शन रांगेची उभारणी झाली आहे.


कोरोनापश्चात दोन वर्षांनी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी यंदा विक्रमी संख्येने वारकरी येतील अशी अपेक्षा आहे. त्याअनुषंगाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना सुविधा पुरवण्याचे काम पूर्ण केले आहे.


आषाढीसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना देवाचे दर्शन मिळावे यासाठी यात्रा काळात १५ दिवस देवाचे दर्शन २४ तास सुरू राहते. त्यामुळे देवाचा पलंग काढून ठेवला जातो. देवाच्या पाठीशी उशा ठेवून त्याला आधार दिला जातो. यंदा १ जुलै पासून १५ जुलैपर्यंत देवाचे दर्शन २४ तास चालू राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.


दर्शन रांगेत पावसाची शक्यता लक्षात घेऊन कायमस्वरूपी ४ आणि तात्पुरती ६ असे एकूण १० पत्राशेड उभे करण्यात आले आहेत. गोपाळपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत दर्शन रांगेसाठी लाकडी बॅरिकेड्स उभा केले आहेत. त्यावर आच्छादन टाकण्यात आले आहे. दर्शन रांगेत पत्राशेड जवळ दोन ठिकाणी अन्नदान, जागोजागी जारमधील पाणीपुरवठा, चहाची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही पुदलवाड यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Ajit Pawar : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- अजित पवार

पुणे : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी

Pune News : सावधान! पुण्यात जलजन्य आजारांचा धोका

कडक उन्हापासून दिलासा देणारा पावसाळा ऋतू. मात्र यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच पाऊस धुमाकूळ घालतोय. पुण्यात या

Monsoon Update: महाराष्ट्रात आज रेड अलर्ट, पुणे-ठाणे आणि सातारासह ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार

महाराष्ट्रात पाऊस परतला, मुंबईसह या जिल्ह्यांना झोडपणार पुणे: महाराष्ट्रात आज दिवसभर वेगवेगळ्या जिल्ह्यात

एका उंदराने केले संपूर्ण शहराचे पाणीबंद, लोकांचे झाले मोठे हाल

चक्क एका उंदरामुळे संपूर्ण संभाजीनगरचा पाणीपुरवठा तब्बल 7 तास बंद झाला होता. संभाजीनगर: उंदरामुळे काय घडेल आणि

‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

मुंबई : पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार दि. १६ जून रोजी तर विदर्भात सोमवार

जामखेडमध्ये प्रहार आक्रमक; कर्जमाफी व दिव्यांगांना मदत करा

प्रहार जनशक्ती पक्षाचे तहसीलदारांना निवेदन जामखेड : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चुभाऊ कडु यांचे गेल्या