पालिका शाळांतील विद्यार्थी अद्याप रेनकोटविनाच

  103

मुंबई (प्रतिनिधी) : जून महिना संपायला आला तरी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अद्यापही रेनकोट आणि बूट मिळालेले नाहीत. त्यामुळे शाळा सुरू होऊन दहा दिवस उलटूनही विद्यार्थ्यांना भिजतच शाळेत जावे लागत आहे. कंत्राटदाराला अद्यापही वर्क ऑर्डर न मिळल्यामुळे विद्यार्थ्यांना हाल सोसावे लागत आहेत.


दरम्यान मुंबईत पालिकेच्या ९ माध्यमांच्या ९६३ शाळा असून त्यात २० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील २४३ शाळा प्राथमिक आहेत. या विद्यार्थ्यांना पालिकेकडून दरवर्षी २७ वस्तूंचे वाटप केले जाते. यात पावसाळ्यासाठी रेनकोट, बूट देखील असतात. सध्या पालिकेने शालेय वस्तूंचे वाटप विद्यार्थींना सुरू केले असले तरी रेनकोट आणि बूटचे वाटप झालेले नाही.


या साठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात यंदा उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यासाठीचे बूट आणि रेनकोट मिळाले नाही. उशिरा निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर कंत्राटदाराला अद्यापही वर्क ऑर्डरच देण्यात आलेली नाही. याबाबत सह आयुक्तांकडे नुकतीच एक बैठक झाली होती. या बैठकीत कंत्राटदाराने इतक्या लवकर साहित्य उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे सांगत ४५ दिवसांचा अवधी मागितला आहे. मात्र लवकरात लवकर साहित्य उपलब्ध करून देण्याचा सूचना अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला केल्याचे समजते.


पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालिका प्रशासनाचा उदासीन दृष्टिकोन आहे. केवळ काही लाभार्थ्यांना फायदा पोचवण्यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई केली जाते.  - प्रभाकर शिंदे, माजी गटनेते, भाजप

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना

मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय

'नांदेड-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार'

मुंबई : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नांदेड शहर