पालिका शाळांतील विद्यार्थी अद्याप रेनकोटविनाच

  97

मुंबई (प्रतिनिधी) : जून महिना संपायला आला तरी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अद्यापही रेनकोट आणि बूट मिळालेले नाहीत. त्यामुळे शाळा सुरू होऊन दहा दिवस उलटूनही विद्यार्थ्यांना भिजतच शाळेत जावे लागत आहे. कंत्राटदाराला अद्यापही वर्क ऑर्डर न मिळल्यामुळे विद्यार्थ्यांना हाल सोसावे लागत आहेत.


दरम्यान मुंबईत पालिकेच्या ९ माध्यमांच्या ९६३ शाळा असून त्यात २० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील २४३ शाळा प्राथमिक आहेत. या विद्यार्थ्यांना पालिकेकडून दरवर्षी २७ वस्तूंचे वाटप केले जाते. यात पावसाळ्यासाठी रेनकोट, बूट देखील असतात. सध्या पालिकेने शालेय वस्तूंचे वाटप विद्यार्थींना सुरू केले असले तरी रेनकोट आणि बूटचे वाटप झालेले नाही.


या साठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात यंदा उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यासाठीचे बूट आणि रेनकोट मिळाले नाही. उशिरा निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर कंत्राटदाराला अद्यापही वर्क ऑर्डरच देण्यात आलेली नाही. याबाबत सह आयुक्तांकडे नुकतीच एक बैठक झाली होती. या बैठकीत कंत्राटदाराने इतक्या लवकर साहित्य उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे सांगत ४५ दिवसांचा अवधी मागितला आहे. मात्र लवकरात लवकर साहित्य उपलब्ध करून देण्याचा सूचना अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला केल्याचे समजते.


पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालिका प्रशासनाचा उदासीन दृष्टिकोन आहे. केवळ काही लाभार्थ्यांना फायदा पोचवण्यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई केली जाते.  - प्रभाकर शिंदे, माजी गटनेते, भाजप

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.