पालिका शाळांतील विद्यार्थी अद्याप रेनकोटविनाच

मुंबई (प्रतिनिधी) : जून महिना संपायला आला तरी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अद्यापही रेनकोट आणि बूट मिळालेले नाहीत. त्यामुळे शाळा सुरू होऊन दहा दिवस उलटूनही विद्यार्थ्यांना भिजतच शाळेत जावे लागत आहे. कंत्राटदाराला अद्यापही वर्क ऑर्डर न मिळल्यामुळे विद्यार्थ्यांना हाल सोसावे लागत आहेत.


दरम्यान मुंबईत पालिकेच्या ९ माध्यमांच्या ९६३ शाळा असून त्यात २० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील २४३ शाळा प्राथमिक आहेत. या विद्यार्थ्यांना पालिकेकडून दरवर्षी २७ वस्तूंचे वाटप केले जाते. यात पावसाळ्यासाठी रेनकोट, बूट देखील असतात. सध्या पालिकेने शालेय वस्तूंचे वाटप विद्यार्थींना सुरू केले असले तरी रेनकोट आणि बूटचे वाटप झालेले नाही.


या साठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात यंदा उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यासाठीचे बूट आणि रेनकोट मिळाले नाही. उशिरा निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर कंत्राटदाराला अद्यापही वर्क ऑर्डरच देण्यात आलेली नाही. याबाबत सह आयुक्तांकडे नुकतीच एक बैठक झाली होती. या बैठकीत कंत्राटदाराने इतक्या लवकर साहित्य उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे सांगत ४५ दिवसांचा अवधी मागितला आहे. मात्र लवकरात लवकर साहित्य उपलब्ध करून देण्याचा सूचना अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला केल्याचे समजते.


पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालिका प्रशासनाचा उदासीन दृष्टिकोन आहे. केवळ काही लाभार्थ्यांना फायदा पोचवण्यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई केली जाते.  - प्रभाकर शिंदे, माजी गटनेते, भाजप

Comments
Add Comment

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र