मुंबई (प्रतिनिधी) : जून महिना संपायला आला तरी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अद्यापही रेनकोट आणि बूट मिळालेले नाहीत. त्यामुळे शाळा सुरू होऊन दहा दिवस उलटूनही विद्यार्थ्यांना भिजतच शाळेत जावे लागत आहे. कंत्राटदाराला अद्यापही वर्क ऑर्डर न मिळल्यामुळे विद्यार्थ्यांना हाल सोसावे लागत आहेत.
दरम्यान मुंबईत पालिकेच्या ९ माध्यमांच्या ९६३ शाळा असून त्यात २० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील २४३ शाळा प्राथमिक आहेत. या विद्यार्थ्यांना पालिकेकडून दरवर्षी २७ वस्तूंचे वाटप केले जाते. यात पावसाळ्यासाठी रेनकोट, बूट देखील असतात. सध्या पालिकेने शालेय वस्तूंचे वाटप विद्यार्थींना सुरू केले असले तरी रेनकोट आणि बूटचे वाटप झालेले नाही.
या साठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात यंदा उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यासाठीचे बूट आणि रेनकोट मिळाले नाही. उशिरा निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर कंत्राटदाराला अद्यापही वर्क ऑर्डरच देण्यात आलेली नाही. याबाबत सह आयुक्तांकडे नुकतीच एक बैठक झाली होती. या बैठकीत कंत्राटदाराने इतक्या लवकर साहित्य उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे सांगत ४५ दिवसांचा अवधी मागितला आहे. मात्र लवकरात लवकर साहित्य उपलब्ध करून देण्याचा सूचना अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला केल्याचे समजते.
पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालिका प्रशासनाचा उदासीन दृष्टिकोन आहे. केवळ काही लाभार्थ्यांना फायदा पोचवण्यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई केली जाते. – प्रभाकर शिंदे, माजी गटनेते, भाजप
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…