शिवसेनेचे सरकार गेल्यातच जमा : नारायण राणे

मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदेसह जवळपास ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून वापरल्या जात असलेल्या इशाऱ्यांचा केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे सरकार गेल्यातच जमा असल्याची टीका केली आहे. आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्याबाबत बोलताना नारायण राणे यांनी युवराजांनी धमक्या देणे बंद ठरावे, असा इशारा दिला आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते, मंत्री एकनाथ शिंदे व नाराज आमदारांसह आसामच्या गुवाहाटीत मुक्कामी आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आमदारांनी बंडखोरी केल्याने मविआ सरकार धोक्यात आले आहे. यातच भाजप नेते नारायण राणे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.


एअरपोर्टवरून उतरले की, विधानभवनात जाणारा रस्ता वरळीतून जातो. या सर्व बंडखोरांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावर नारायण राणे यांनी ट्वीट करून म्हटले की, शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणे बंद करावे. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेते बाहेर पडतील’, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल? असे सांगत नारायण राणे यांनी शिवसेनेकडून वापरल्या जाणाऱ्या इशारावजा भाषेचा समाचार घेतला.


संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील व त्यांचे शवविच्छेदन होईल, असे विधान केले होते. त्यावर ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेत बाहेर पडतील’, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल?, असे म्हणत बोचरी टीका केली. ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेते बाहेर पडतील, अशा धमक्या देणे हा गुन्हा होत नाही का?’ असा सवाल नारायण राणे यांनी केला.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल