मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधवची न्यायालयीन कोठडीत रवानगी

  90

पुणे (हिं.स.) : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष सुनील जाधव (वय २८, रा. मंचर) याला विशेष न्यायालयाने पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.


बाणखेलेच्या खुनानंतर फरारी संतोषला आश्रय देणाऱ्या सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ (वय १९, रा. नारायणगाव), नवनाथ सुरेश सूर्यवंशी (वय २८, रा. गुजरात) आणि तेजस कैलास शिंदे (वय २२, रा. नारायणगाव) यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले.


राण्या ऊर्फ ओंकार बाणखेले याचा पूर्ववैमनस्यातून आंबेगावमधील एकलहरे गावात खून करण्यात आला होता. या खुनानंतर संतोष जाधव हा फरार झाला होता. त्याच्यासह १४ जणांवर मोका कारवाई करण्यात आली आहे. मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष व महाकाल यांची नावे शार्प शूटर म्हणून पुढे आली होती.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या