शिवसेनेतील बंडामागे भाजप नाही - चंद्रकांत पाटील

पुणे (हिं.स.) : शिवसेनेतील बंडामागे भाजप नाही. राज्य सरकार स्थिर आहे, की अस्थिर आहे याकडे आमचे लक्षही नाही. आम्ही आमची कामे करत आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यावेळी “आसामचे मंत्री बंडखोर आमदारांच्या हॉटेलवर काय करतात?’ असे विचारले असता, “त्याची कल्पना नसून, ही माहिती तुमच्याकडूनच समजते,’ असेही पाटील यांनी सांगितले.


शिवसेना आमदारांच्या बंडामुळे राजकीय वातावरण तापले असून, त्यात भाजपचा हात असल्याचे बोलले जात आहे. यावेळी बडोदा येथे केंद्रीय मंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाल्याचे बोलले जाते, असे पाटील यांना विचारले असता, ही माहिती मला तुमच्याकडूनच कळते असे सांगितले.


फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, “फडणवीस यांच्या दिल्ली भेटी नियमित आहेत. माध्यमांना आता त्या लक्षात येत आहेत. फडणवीस यांच्या कामाला वेग आहे. ते त्यांना हवी असलेली बैठकीची वेळ मिळाली की उद्या जाऊ, परवा जाऊ असे न करता रात्री-बेरात्री निघतात. त्यांच्या बैठका नेहमीच जास्त होतात.’

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे