उद्धव ठाकरेंनी बहुमत गमावले आहे - दीपक केसरकर

गुवाहाटी (हिं.स.) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाचे बहुमत गमावले आहे हे मान्य करावे. राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून जिंकल्यानंतर त्यांनी लोकशाहीचा आदर केला करायला हवा होता असे परखड मत शिवसेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी मांडले.


केसरकर म्हणाले की, आम्ही ३५ वर्षे भाजपसोबत युती केली आणि युतीत राहून आम्ही निवडणुका जिंकलो, त्यामुळे लोकशाहीचा आदर केला पाहिजे. आपल्या पक्षाने बहुमत गमावले, यालाच लोकशाही म्हणतात हे उद्धव ठाकरेंनी मान्य केले पाहिजे. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर गुवाहाटी येथून पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, आम्ही सर्व शिवसैनिक आहोत, आम्हाला नवीन नाव घेण्याची गरज नाही. पक्षाचे बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहेत, त्यामुळे आमच्या गटबाजीला मान्यता मिळावी, एवढीच आमची इच्छा आहे. उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी आमच्या मागणीकडे लक्ष न दिल्यास आम्हाला न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल त्यांनी सांगितले.


आकडे आमच्याकडे आहेत, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. पण आम्ही आमच्या पक्षाध्यक्षाचा आदर करतो आणि आमचा गट इतर कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. आमच्या गटाला मान्यता न मिळाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ किंवा दुसरा मार्ग स्वीकारू असा इशारा त्यांनी दिला. हा संविधानिक संघर्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही सोडणार नाही. आम्ही कोणतेही चुकीचे किंवा बेकायदेशीर काम करणार नसल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांचा दावा आहे की त्यांना ५५ पैकी ३८ शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा आहे, जे २८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत पक्षाच्या संख्याबळाच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ ते एकतर शिवसेना सोडू शकतात आणि दुसरा राजकीय पक्ष स्थापन करू शकतात किंवा विधानसभेतून अपात्र न होता दुसर्या पक्षात विलीन होऊ शकतात. शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव 'शिवसेना बाळासाहेब' ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही केसरकर यांनी सांगितले.


आम्ही शिवसेना बाळासाहेब नावाचा नवा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भविष्यात या गटाचे नाव देऊ. नव्याने स्थापन झालेल्या गटाच्या नावाने आमचे कार्यालय विधानभवनात असेल. त्यांच्या गटाच्या नोंदणीची अंतिम मुदत काय आहे, असे विचारले असता ते म्हणाले की, नवनिर्वाचित नेते एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. हा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, ते आमचे नेते आहेत, तेच त्यावर निर्णय घेतील, असे केसरकर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील काही भागांतील बंडखोर आमदारांच्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीचा संदर्भ देत, त्यांनी हिंसाचारावर कारवाई करण्याची मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांना "तुमच्या शिवसैनिकांवर नियंत्रण ठेवा" असे आवाहन त्यांनी केले. एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला पोहोचलेल्या आमच्या आमदारांसोबत नुकत्याच झालेल्या हिंसक घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी. त्यांनी आपल्या शिवसैनिकांवर नियंत्रण ठेवावे, मुख्यमंत्री म्हणून ही त्यांची जबाबदारी आहे. कायदा व सुव्यवस्था कोणाचीही असली तरी हातात घेऊ नये.


राजकीय गोंधळात उद्धव गटाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केसरकर यांनी टीका केली. राष्ट्रवादीला शिवसेनेला संपवायचे आहे. आम्ही आता दोन वर्षांहून अधिक काळ याचा सहन करीत आहोत, परंतु आता असह्य झाले आहे. ज्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव यांनी हातमिळवणी केली आहे. विधानसभा उपसभापतींनी १६ बंडखोर आमदारांना दिलेल्या नोटीसच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, ही लोकशाहीची थट्टा आहे. आम्हाला नवीन गट तयार करण्याचा अधिकार आहे आणि नोटिसा पाठवणे ही जबरदस्तीची युक्ती आहे. केसरकर म्हणाले की, मुंबईत कधी जायचे आणि पुढे काय करायचे याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली

IDFC FIRST Bank: बँकिंग क्षेत्रात ५९० कोटींचा घोटाळा; माजी मॅनेजरने बायकोच्या जोडीने मारला बँकेच्या तिजोरीवर डल्ला

मुंबई: बँकिंग क्षेत्रात सध्या एका मोठ्या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड