भारत-श्रीलंका आमनेसामने

कोलंबो (वृत्तसंस्था) : भारतीय महिला संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यात टी२० आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. उभय संघांत उद्या गुरुवारपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.


भारतीय महिला संघ वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच मालिका खेळणार आहे. यासाठी खास श्रीलंका दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात गुरुवारी सलामीचा टी-२० सामना रंगणार आहे. त्यानंतर २५ व २७ जून रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा टी२० सामना होणार आहे. रनगिरी दाम्बुला इंटरनॅशनल स्टेडियमवर टी-२० मालिकेतील सामने आयोजित करण्यात आले आहेत.


त्यानंतर हे दोन्ही संघ १ जुलैला सलामीच्या एकदिवसीय सामन्यात समोरासमोर असतील. तसेच ४ जुलैला दुसरा आणि ७ जुलैला तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. हे सामने पल्लेकल येथे होणार आहेत.


हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर, स्मृती मन्धाना, यस्तीका भाटीया, सभीनेनी मेघना, जेमीमाह रॉड्रीक्स, दीप्ती शर्मा अशा तगड्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान यजमानांसमोर आहे. तर चमारी अट्टापट्टू, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, विश्मी गुणरत्ने यांच्यावर श्रीलंकेच्या संघाची जबाबदारी आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत