नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा हक्क मिळणार का याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. उच्च न्यायालयाने मागणी फेटाळल्यानंतर मलिक आणि देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांची परवानगी फेटाळली आहे. त्यामुळे नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदानापासून वंचित राहिले आहेत.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळालेली नाही. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना आता विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीने ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ठाकरे सरकारला आणखी “थप्पड”. सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख ची याचिका फेटाळली, असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…