सीबीआय कोर्टाने फेटाळला सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज

नवी दिल्ली (हिं.स.) : मनी लाँड्रिग प्रकरणी अटकेत असलेलेल दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. जैन यांनी जामीन मंजूर करण्यासाठी हा खटल्याचा योग्य टप्पा नसल्याचे सांगत न्या. गीतांजली गोयल यांनी जैन यांना दिलासा देण्यास नकार दिला.


अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ३० मे रोजी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांखाली अटक केली. ईडीने यापूर्वी जैन आणि त्यांच्या नियंत्रणाखालील कंपन्यांची ४.८१ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली होती. तपास यंत्रणेने राम प्रकाश ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अंकुश जैन, वैभव जैन, नवीन जैन, योगेश कुमार जैन आणि सिद्धार्थ जैन आणि अंकुश जैन यांचे सासरे आणि प्रुडन्स चालवणारे लाला शेर सिंग यांनाही अटक केली आहे. ग्रुप ऑफ स्कूल्स, जीवन विज्ञान ट्रस्टचे अध्यक्ष जी. एस. मथारू आणि जीवन विज्ञान ट्रस्टचे लाला शेर सिंग यांच्या ठिकाणी छापे टाकले. झडतीदरम्यान डिजिटल रेकॉर्ड जप्त करण्यात आले.


न्यायालयाने मंगळवारी सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावरील निर्णय १८ जूनपर्यंत राखून ठेवला होता. जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार एका प्रकरणात अटक केली होती. जैन यांना त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्तेप्रकरणी अटक करण्यात आली होती. विशेष न्यायाधीश (पीसी ॲक्ट) गीतांजली गोयल यांनी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने युक्तिवाद ऐकल्यानंतर जैन यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.


मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) तपास सुरू आहे. ईडीचे छापे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जैन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जैन यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे असलेले सर्व खाते दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय