सीबीआय कोर्टाने फेटाळला सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज

नवी दिल्ली (हिं.स.) : मनी लाँड्रिग प्रकरणी अटकेत असलेलेल दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. जैन यांनी जामीन मंजूर करण्यासाठी हा खटल्याचा योग्य टप्पा नसल्याचे सांगत न्या. गीतांजली गोयल यांनी जैन यांना दिलासा देण्यास नकार दिला.


अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ३० मे रोजी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांखाली अटक केली. ईडीने यापूर्वी जैन आणि त्यांच्या नियंत्रणाखालील कंपन्यांची ४.८१ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली होती. तपास यंत्रणेने राम प्रकाश ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अंकुश जैन, वैभव जैन, नवीन जैन, योगेश कुमार जैन आणि सिद्धार्थ जैन आणि अंकुश जैन यांचे सासरे आणि प्रुडन्स चालवणारे लाला शेर सिंग यांनाही अटक केली आहे. ग्रुप ऑफ स्कूल्स, जीवन विज्ञान ट्रस्टचे अध्यक्ष जी. एस. मथारू आणि जीवन विज्ञान ट्रस्टचे लाला शेर सिंग यांच्या ठिकाणी छापे टाकले. झडतीदरम्यान डिजिटल रेकॉर्ड जप्त करण्यात आले.


न्यायालयाने मंगळवारी सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावरील निर्णय १८ जूनपर्यंत राखून ठेवला होता. जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार एका प्रकरणात अटक केली होती. जैन यांना त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्तेप्रकरणी अटक करण्यात आली होती. विशेष न्यायाधीश (पीसी ॲक्ट) गीतांजली गोयल यांनी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने युक्तिवाद ऐकल्यानंतर जैन यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.


मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) तपास सुरू आहे. ईडीचे छापे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जैन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जैन यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे असलेले सर्व खाते दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च