कपिल देवच्या ‘त्या’ ऐतिहासिक खेळाला ३० वर्षे पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत तत्कालीन कर्णधार कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद १७५ धावांची मॅरेथॉन खेळी खेळली होती. कपिल देव यांच्या या ऐतिहासिक खेळीला शनिवारी ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत.


भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला नमवून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. या विश्वचषकातील साखळी सामन्यात कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद १७५ धावांची खेळी खेळली होती. कपिल देव यांच्या या ऐतिहासिक खेळीला शुक्रवारी ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत.


१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात १८ जून रोजी टुनब्रिज वेल्स मैदानावर सामना खेळण्यात आला होता. हा सामना भारताने ३१ धावांनी जिंकला होता. भारताच्या या विजयात कर्णधार कपिल देव यांचे मोलाचे योगदान होते. या सामन्यात त्यांनी नाबाद १७५ धावांची खेळी खेळत क्रीडा रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु दुर्दैवाने भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कपिल यांची खेळी कॅमेऱ्यात कधीच रेकॉर्ड झाली नाही.


झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर सुनील गावस्कर आणि कृष्णमाचारी श्रीकांत खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यांच्यानंतर मोहिंदर अमरनाथ (५ धावा), संदीप पाटील (१ धाव) आणि यशपाल शर्मा (९ धावा) यांनाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. या सामन्यात फक्त १७ धावांवर भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता.


झिम्बाब्वेच्या केविन करन आणि पीटर रॉसन यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांची दमछाक झाली. या सामन्यात भारतीय संघ ५० धावाही करू शकणार की नाही? असे वाटू लागले होते. परंतु, त्यानंतर मैदानात आलेल्या कपिल देवने संघाचा डाव सावरत १७५ धावांची ऐतिहासिक खेळी करत भारताची धावसंख्या २५० पार पोहचवली. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने झिम्बॉव्वेच्या संघाला २३५ धावांवर सर्वबाद केले.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए