यंदा दहावीच्या निकालात १.६४ टक्क्यांनी वाढ

पुणे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के एवढा लागला आहे.


मागील वर्षा पेक्षा यंदाच्या निकालात १.६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुलांपेक्षा मुलींनी निकालात बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक ९९.२७ टक्के तर सर्वात कमी नाशिक विभागाचा ९५.९० टक्के एवढा आहे. दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली.


या परीक्षेसाठी राज्यातील १६ लाख ३८ हजार ९६४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यात ८ लाख ८९ हजार ५०६ मुले तर ७ लाख ४९ हजार ४५८ मुलींचा समावेश होता. राज्य मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यावेळी सचिव डॉ. अशोक भोसले उपस्थित होते.


विभागीय मंडळनिहाय टक्केवारीत निकाल – पुणे – ९६.९६, नागपूर- ९७, औरंगाबाद- ९६.३३, मुंबई- ९६.९४, कोल्हापूर- ९८.५०, अमरावती- ९६.८१, नाशिक- ९५.९०, लातूर- ९७.२७, कोकण -९९.२७.


निकाल




  • मुले – ९६.०६ टक्के

  • मुली – ९७.९६ टक्के

Comments
Add Comment

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.