यंदा दहावीच्या निकालात १.६४ टक्क्यांनी वाढ

  107

पुणे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के एवढा लागला आहे.


मागील वर्षा पेक्षा यंदाच्या निकालात १.६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुलांपेक्षा मुलींनी निकालात बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक ९९.२७ टक्के तर सर्वात कमी नाशिक विभागाचा ९५.९० टक्के एवढा आहे. दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली.


या परीक्षेसाठी राज्यातील १६ लाख ३८ हजार ९६४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यात ८ लाख ८९ हजार ५०६ मुले तर ७ लाख ४९ हजार ४५८ मुलींचा समावेश होता. राज्य मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यावेळी सचिव डॉ. अशोक भोसले उपस्थित होते.


विभागीय मंडळनिहाय टक्केवारीत निकाल – पुणे – ९६.९६, नागपूर- ९७, औरंगाबाद- ९६.३३, मुंबई- ९६.९४, कोल्हापूर- ९८.५०, अमरावती- ९६.८१, नाशिक- ९५.९०, लातूर- ९७.२७, कोकण -९९.२७.


निकाल




  • मुले – ९६.०६ टक्के

  • मुली – ९७.९६ टक्के

Comments
Add Comment

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, पुण्यात 27 ते 6 तारखेपर्यंत दारू बंदी

पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात २७ ते ६

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी