प्रहार    

देशात १२ हजार ८४७ नवे कोरोना रूग्ण

  95

देशात १२ हजार ८४७ नवे कोरोना रूग्ण

नवी दिल्ली (हिं.स.) : देशातील कोरोनाच्या संसर्गात सातत्याने वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत १२ हजार ८४७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


देशात गुरुवारी दिवसभरात १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, ७ हजार ९८५ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत. एकीकडे सरकारकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे जगभरात पसरलेल्या मंकीपॉक्स व्हायरसच्या धोक्यामुळेही आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.


महाराष्ट्रात गुरुवारी ४ हजार २५५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी राज्यात ४०२४ रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील २४ तासात २८७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्ताची संख्या ७७ लाख ५५ हजार १८३ इतकी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.८७ एवढे झाले आहे.

Comments
Add Comment

Stray Dog Shelter : कुत्र्यांमुळे मृत्यू झालेल्यांना परत आणणार आहात का? सुप्रीम कोर्टाने प्राणीप्रेमींना धरले फैलावर; काय आहेत कोर्टाचे कडक आदेश?

नवी दिल्ली : मुंबईत कबुतरखान्यावरून सुरू असलेला वाद थंड पडलेला नाही, तसेच दुसरीकडे दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या

केदारनाथच्या भाविकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज; गर्दी नियंत्रणाबाहेर

देहरादून : केदारनाथ धाम यात्रेसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर

'सोनिया गांधी यांचे नाव भारतीय नागरिक होण्यापूर्वीपासून मतदार यादीत होते', भाजपचा मोठा आरोप,

नवी दिल्ली: भाजपने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांच्या मतचोरी

Jagannath Temple : जगन्नाथ पुरी मंदिर उडवण्याची धमकी! भिंतीवर लिहिला संदेश, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट

ओडिसा:  ओडिसामधील पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. मात्र, हे जगन्नाथ मंदिर उडवण्याची धमकी

पंतप्रधान मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता

नवी दिल्ली : अमेरिकेच्या करवाढीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र

राजस्थानमध्ये भीषण अपघातात ११ भाविकांचा मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. खातू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप