दहावीचा निकाल ९६.९४ टक्के

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी जाहीर झाला. यात ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाले आहेत. निकाताल मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. स्टेट बोर्डाच्या ९ विभागांपैकी निकालात कोकण विभाग ९९.२७ टक्क्यांसह अव्वल असून नाशिक विभाग ९५.९० टक्क्यांसह तळाशी गेलाय.


राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या ९ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (९५.९० टक्के) विभागाचा लागला आहे. यंदा राज्यातून एकूण १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकावली आहे.


तर राज्यातील १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागलाय. इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुणे विभागाचा निकाल ९६.१६ टक्के, नागपूर ९७, औरंगाबाद ९६.३३, मुंबई ९६.९४, कोल्हापूर ९८.५०, अमरावती ९६.८१ आणि नाशिक विभागाचा निकाल ९५.९० टक्के इतका आहे. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती, अटी, शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway: तिसऱ्या दिवशीही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे जैसे थे..; प्रवाशी हतबल

मुंबई: आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याने

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे

Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या