दहावीचा निकाल ९६.९४ टक्के

  64

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी जाहीर झाला. यात ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाले आहेत. निकाताल मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. स्टेट बोर्डाच्या ९ विभागांपैकी निकालात कोकण विभाग ९९.२७ टक्क्यांसह अव्वल असून नाशिक विभाग ९५.९० टक्क्यांसह तळाशी गेलाय.


राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या ९ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (९५.९० टक्के) विभागाचा लागला आहे. यंदा राज्यातून एकूण १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकावली आहे.


तर राज्यातील १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागलाय. इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुणे विभागाचा निकाल ९६.१६ टक्के, नागपूर ९७, औरंगाबाद ९६.३३, मुंबई ९६.९४, कोल्हापूर ९८.५०, अमरावती ९६.८१ आणि नाशिक विभागाचा निकाल ९५.९० टक्के इतका आहे. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती, अटी, शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ