सांगली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. सांगलीतील इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट रद्द केले.
शिराळा न्यायालयाने राज यांच्याविरोधात अटक वॉरंट काढल्यानंतर त्यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करुन त्यांना जामीन मंजूर करावा, असा अर्ज इस्लामपूर इथल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली. कनिष्ठ न्यायालय ज्यावेळी निर्देश देईल त्यावेळी राज ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहावे, असे कोर्टाने सुनावणीच्या वेळी म्हटले आहे.
दहा जणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे अशा विविध कलमाखाली तसेच २८ जानेवारी, २५ जानेवारी, ११ फेब्रुवारी आणि २८ एप्रिल २०२२ या तारखांना गैरहजर राहिल्याबद्दल यांच्यावर शिराळा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…