केतकीला जामिन मिळूनही तुरूंगवास कायम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलच्या वादग्रस्त पोस्टनंतर अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत सापडली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावरील इतर गुन्ह्यांचा तपासही सुरु आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार केतकीला अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत जामीन मंजूर करण्यात आला आहे.


२५ हजार रुपयांच्या दंडानंतर तिला जामीन मंजूर झाला असला तरी तुरुंगातून मात्र तिची सुटका अद्याप झालेली नाही. कारण एका दुसऱ्या केसची सुनावणी केतकीविरुद्ध सुरु असून ही सुनावणी २१ जून रोजी होणार असल्याने ती अद्यापही जेलमध्येच राहणार आहे.


दुसरीकडे केंद्रीय महिला आयोगानेही या प्रकरणात उडी घेत पोलीस महासंचालक रजनीस सेठ यांना नोटीस पाठवली आहे.
अभिनेत्री केतकीने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ज्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करुन तिला तुरुंगात देखील टाकण्यात आले आहे.


या प्रकरणात सतत नवनवीन अपडेट समोर येत असून नुकतच केतकीने मुंबई उच्च न्यायालयात तिला झालेली अटक बेकायदेशीर असल्याची याचिका दाखल केली. ज्यानंतर आता केंद्रीय महिला आयोगाने देखील तिच्या बाजूने येत पोलीस महासंचालक रजनीस सेठ यांना नोटीस पाठवली आहे.


दरम्यान नाशिकचा विद्यार्थी निखिल भामरे याने देखील पवारांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यावर त्यानेही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. न्यायालयाने म्हटले होते की, रोज हजारो ट्वीट केले जाता. मग प्रत्येक ट्वीटची दखल घेणार का?, असे म्हणत पवारांनाही असे विद्यार्थ्याला डांबून ठेवणे आवडणार नाही. यामुळे त्यांच्या नावाला गालबोट लागेल.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी