आयर्लंड दौऱ्यात हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची कमान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात २६ जूनपासून दोन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे.


या मालिकेसाठी गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीला संघात संधी मिळाली आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव, संजू सॅमसनचेही संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका १९ जून रोजी संपल्यानंतर भारतीय संघ २६ जूनपासून आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. या मालिकेसाठी नुकतीच संघाची घोषणा करण्यात आली.

Comments
Add Comment

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

असं चकवलं कांगारुंना, शिवम दुबेने दिली माहिती

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने

जसप्रीत बुमराहचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२०

अक्षर पटेलची दमदार कामगिरी ! विराट आणि ख्रिस गेलशी बरोबरी

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल

भारताच्या फिरकी गोलंदाजांनी 'कांगारुं'चा उडवला धुव्वा!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे पारडे जड ; मालिकेत २-१ ने आघाडी; वॉशिंग्टनच्या फिरकीची जादूने ८ चेंडूत ३ बाद कॅरारा :