आयर्लंड दौऱ्यात हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची कमान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात २६ जूनपासून दोन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे.


या मालिकेसाठी गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीला संघात संधी मिळाली आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव, संजू सॅमसनचेही संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका १९ जून रोजी संपल्यानंतर भारतीय संघ २६ जूनपासून आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. या मालिकेसाठी नुकतीच संघाची घोषणा करण्यात आली.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत