अयोध्येत 'महाराष्ट्र सदन' बांधणार- आदित्य ठाकरे

  93

अयोध्या (हिं.स.) : प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांसाठी ‘महाराष्ट्र सदन’ बांधण्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी खा. संजय राऊत आणि निलम गोऱ्हे प्रामुख्याने उपस्थित होत्या.


याप्रसंगी आदित्य ठाकरे म्हणाले की, आमची अयोध्या यात्रा राजकीय नसून आम्ही तिर्थयात्रेवर आलोय. अयोध्येत १०० खोल्यांचे भव्य महाराष्ट्र सदन व्हावे असा आमच्या सरकारचा मनोदय आहे. याबाबत उद्धव ठाकरे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहेत. महाराष्ट्रातून अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात. त्यांना राहण्यासाठी एक चांगली जागा आपल्याला इथे निर्माण करायची आहे. गेल्या तीन वर्षात आपण शिवसेना कुटुंबासोबत चौथ्यांदा अयोध्येत येत आहोत. पण कार्यकर्त्यांचा जल्लोष तसाच कायम आहे.


आता राम मंदिर निर्माण होत असताना अनेक शिवसैनिक रामजन्मभूमीत आले आहेत. सन २०१८ मध्ये मी पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला आलो होतो. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती "पहिले मंदिर फिर सरकार". शिवसेनेच्या या भूमिकेनंतर वेगाने घडामोडी घडल्या, पुढे कोर्टाचा निकाल आला आणि मंदिराचा मार्ग मोकळा झाला, असेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. अयोध्या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी रामललाचे दर्शन घेतले. तसेच इस्कॉन मंदिराला देखील त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी इस्कॉन मंदिरात महाप्रसाद घेतला. त्यानंतर त्यांनी हनुमान गडी येथे जाऊन दर्शन घेतले.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.