अयोध्येत 'महाराष्ट्र सदन' बांधणार- आदित्य ठाकरे

अयोध्या (हिं.स.) : प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांसाठी ‘महाराष्ट्र सदन’ बांधण्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी खा. संजय राऊत आणि निलम गोऱ्हे प्रामुख्याने उपस्थित होत्या.


याप्रसंगी आदित्य ठाकरे म्हणाले की, आमची अयोध्या यात्रा राजकीय नसून आम्ही तिर्थयात्रेवर आलोय. अयोध्येत १०० खोल्यांचे भव्य महाराष्ट्र सदन व्हावे असा आमच्या सरकारचा मनोदय आहे. याबाबत उद्धव ठाकरे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहेत. महाराष्ट्रातून अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात. त्यांना राहण्यासाठी एक चांगली जागा आपल्याला इथे निर्माण करायची आहे. गेल्या तीन वर्षात आपण शिवसेना कुटुंबासोबत चौथ्यांदा अयोध्येत येत आहोत. पण कार्यकर्त्यांचा जल्लोष तसाच कायम आहे.


आता राम मंदिर निर्माण होत असताना अनेक शिवसैनिक रामजन्मभूमीत आले आहेत. सन २०१८ मध्ये मी पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला आलो होतो. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती "पहिले मंदिर फिर सरकार". शिवसेनेच्या या भूमिकेनंतर वेगाने घडामोडी घडल्या, पुढे कोर्टाचा निकाल आला आणि मंदिराचा मार्ग मोकळा झाला, असेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. अयोध्या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी रामललाचे दर्शन घेतले. तसेच इस्कॉन मंदिराला देखील त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी इस्कॉन मंदिरात महाप्रसाद घेतला. त्यानंतर त्यांनी हनुमान गडी येथे जाऊन दर्शन घेतले.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च