अयोध्येत 'महाराष्ट्र सदन' बांधणार- आदित्य ठाकरे

अयोध्या (हिं.स.) : प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांसाठी ‘महाराष्ट्र सदन’ बांधण्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी खा. संजय राऊत आणि निलम गोऱ्हे प्रामुख्याने उपस्थित होत्या.


याप्रसंगी आदित्य ठाकरे म्हणाले की, आमची अयोध्या यात्रा राजकीय नसून आम्ही तिर्थयात्रेवर आलोय. अयोध्येत १०० खोल्यांचे भव्य महाराष्ट्र सदन व्हावे असा आमच्या सरकारचा मनोदय आहे. याबाबत उद्धव ठाकरे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहेत. महाराष्ट्रातून अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात. त्यांना राहण्यासाठी एक चांगली जागा आपल्याला इथे निर्माण करायची आहे. गेल्या तीन वर्षात आपण शिवसेना कुटुंबासोबत चौथ्यांदा अयोध्येत येत आहोत. पण कार्यकर्त्यांचा जल्लोष तसाच कायम आहे.


आता राम मंदिर निर्माण होत असताना अनेक शिवसैनिक रामजन्मभूमीत आले आहेत. सन २०१८ मध्ये मी पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला आलो होतो. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती "पहिले मंदिर फिर सरकार". शिवसेनेच्या या भूमिकेनंतर वेगाने घडामोडी घडल्या, पुढे कोर्टाचा निकाल आला आणि मंदिराचा मार्ग मोकळा झाला, असेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. अयोध्या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी रामललाचे दर्शन घेतले. तसेच इस्कॉन मंदिराला देखील त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी इस्कॉन मंदिरात महाप्रसाद घेतला. त्यानंतर त्यांनी हनुमान गडी येथे जाऊन दर्शन घेतले.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला