एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत कोहलीची घसरण

लंडन (वृत्तसंस्था) : आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारी जाहीर केली आहे. यात फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली असून तो तिसऱ्या स्थानावर आला आहे, तर आजी कर्णधार रोहित शर्मा चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अग्रस्थानी आहे. तर त्यांचाच इमाम-उल हक दुसऱ्या स्थानावर आहे. पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक आहे.


गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमरा पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा जोस हेजलवूड आहे. मॅट हेन्री तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या दहा अष्टपैलू खेळाडूमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. बांग्लादेशचा शाकीब अल हसन पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसऱ्या स्थानावर आहे.


टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी, फलंदाजी आणि अष्टपैलू यामध्ये अव्वल दहा खेळाडूमध्ये फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. फलंदाजीत भारताचा इशान किशन सहाव्या क्रमांकावर आहे. कसोटी क्रमवारीमध्ये फलंदाजीत विराट कोहली दहाव्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आहे. फलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेनच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. लाबुशेन दुसऱ्या क्रमांकावर घसरलाय. इंग्लंडच्या जो रुटने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर स्मिथ तिसऱ्या आणि बाबर आझम चौथ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पाचव्या क्रमांकावर आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत