संतांची शिकवण मोदींच्या आचरणात दिसून येते - फडणवीस

  117

पुणे (हिं.स.) : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांनी दिलेली शिकवण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आचरणातून दिसून येत असल्याचे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.


पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. या लोकार्पण सोहळ्यात फडणवीस बोलत होते.


याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यात आहेत, याचा आनंद आहे. आपल्या संतांनी दिलेली शिकवणच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आचरणात दिसून येते, असे म्हणत फडणवीसांनी मोदींनीही सेवाधर्म जपल्याचे सांगितले.


जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले !
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा !!


संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओवींचं प्रत्यक्षात अनुकरण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. जे का रंजले, गांजले त्यांचे सेवक बनून काम करण्याची शिकवण आपणास तुकाराम महाराजांनी दिली. तुकाराम महाराजांची हिच शिकवण नरेंद्र मोदी प्रधान सेवक बनून गरिबांच्या कल्यासाठी काम करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत. कारण, वारकऱ्यांमध्ये कोणी मोठे नसते, कोणी छोटं नसते. वारकऱ्यांमध्ये सर्वच सेवक असतात असेही फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक