संतांची शिकवण मोदींच्या आचरणात दिसून येते - फडणवीस

  122

पुणे (हिं.स.) : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांनी दिलेली शिकवण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आचरणातून दिसून येत असल्याचे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.


पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. या लोकार्पण सोहळ्यात फडणवीस बोलत होते.


याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यात आहेत, याचा आनंद आहे. आपल्या संतांनी दिलेली शिकवणच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आचरणात दिसून येते, असे म्हणत फडणवीसांनी मोदींनीही सेवाधर्म जपल्याचे सांगितले.


जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले !
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा !!


संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओवींचं प्रत्यक्षात अनुकरण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. जे का रंजले, गांजले त्यांचे सेवक बनून काम करण्याची शिकवण आपणास तुकाराम महाराजांनी दिली. तुकाराम महाराजांची हिच शिकवण नरेंद्र मोदी प्रधान सेवक बनून गरिबांच्या कल्यासाठी काम करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत. कारण, वारकऱ्यांमध्ये कोणी मोठे नसते, कोणी छोटं नसते. वारकऱ्यांमध्ये सर्वच सेवक असतात असेही फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील सरपंचांना दिल्लीत मोठा मान

महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण नवी दिल्ली : यंदाच्या

जमीन विक्रीस हरकत घेणा-या आईचा गळा घोटला; नंतर केली आत्महत्या

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून

अमरावतीत आईने मुलीला तर आत्याने भाच्याला दिले जीवनदान

अमरावती : संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) गेल्या दोन दिवसांत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात आईने

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा

मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार पुणे: महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा

'पत्नीच्या कपड्यांवर किंवा स्वयंपाकावर टीका करणे ही क्रूरता नाही', मुंबई उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

पत्नीची फिर्याद फेटाळली, पतीची निर्दोष मुक्तता औरंगाबाद:  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका

वाईत रक्षाबंधनाला महिलांची भावनिक साद, मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलं पत्र, लाडक्या बहिणींनी केली न्यायाची मागणी

"ओवाळणीत दीड हजार नको, तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या,” वाई: साताऱ्यातील वाईमधील