शेअर बाजार घसरला, गुंतवणूकदारांचे नुकसान


  • शेअर बाजारासाठी काळा दिवस

  • सात लाख कोटी रूपयांचे नुकसान


मुंबई : शेअर बाजारासाठी सोमवार, १३ जुनचा दिवस हा काळा दिवस असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स १,४५६ अंकांनी घसरला तर निफ्टीही ४२७ अंकांनी घसरला.


अमेरिकेतील महागाईचे परिणाम शुक्रवारी वॉल स्ट्रीटवर बघायला मिळाले होते. त्यात फेडकडून येणाऱ्या बैठकीत व्याजदर ०.७५ टक्क्यांनी वाढविण्याचा विचार असल्याने त्याचा दबाव जगभरातील बाजारांवर दिसत आहे. बाजारातील लिक्विडिटी कमी झाली तर त्याचा फटका शेअर बाजारांना बसत असतो आणि हाच फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. मोठ्या प्रमाणात समभागांची विक्री बघायला मिळाली आहे.


सेन्सेक्समध्ये आज २.६८ टक्क्यांची घसरण झाली असून तो ५२,८६४ स्थिरावला. निफ्टीमध्ये २.६४ टक्क्यांची घसरण होऊन तो १५,७७४ अंकांवर स्थिरावला. शेअर बाजार बंद होताना ६५० कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर २७५९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. ११७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.


आज शेअर बाजार बंद होताना बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, टेक महिंन्द्रा, इंडसलँड बँक आणि हिंदालको इंडस्ट्रीज कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर नेस्ले इंडिया आणि बजाज ऑटो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. बीएसई मिडकॅपमध्ये २.७ टक्क्यांचा तर स्मॉलकॅपमध्ये ३ टक्क्यांची घट झाली आहे.


डॉलरच्या तुलनेत आजही रुपयाची घसरण झाली आहे. शुक्रवारच्या ७७.८४ रुपयाच्या तुलनेत सोमवारी रुपयाची किंमत ७८.२८ रुपयांवर पोहोचली आहे. रुपयाची ही आतापर्यंतची निचांक्क पातळी आहे. आज शेअर बाजार बंद होताना सार्वजनिक बँका, खासगी बँका, आयटी, रिअॅलिटी, कॅपिटल गुड्स, ऑटो, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये २ ते ४ टक्क्यांची घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील

अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी

मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने