शेअर बाजार घसरला, गुंतवणूकदारांचे नुकसान


  • शेअर बाजारासाठी काळा दिवस

  • सात लाख कोटी रूपयांचे नुकसान


मुंबई : शेअर बाजारासाठी सोमवार, १३ जुनचा दिवस हा काळा दिवस असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स १,४५६ अंकांनी घसरला तर निफ्टीही ४२७ अंकांनी घसरला.


अमेरिकेतील महागाईचे परिणाम शुक्रवारी वॉल स्ट्रीटवर बघायला मिळाले होते. त्यात फेडकडून येणाऱ्या बैठकीत व्याजदर ०.७५ टक्क्यांनी वाढविण्याचा विचार असल्याने त्याचा दबाव जगभरातील बाजारांवर दिसत आहे. बाजारातील लिक्विडिटी कमी झाली तर त्याचा फटका शेअर बाजारांना बसत असतो आणि हाच फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. मोठ्या प्रमाणात समभागांची विक्री बघायला मिळाली आहे.


सेन्सेक्समध्ये आज २.६८ टक्क्यांची घसरण झाली असून तो ५२,८६४ स्थिरावला. निफ्टीमध्ये २.६४ टक्क्यांची घसरण होऊन तो १५,७७४ अंकांवर स्थिरावला. शेअर बाजार बंद होताना ६५० कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर २७५९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. ११७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.


आज शेअर बाजार बंद होताना बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, टेक महिंन्द्रा, इंडसलँड बँक आणि हिंदालको इंडस्ट्रीज कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर नेस्ले इंडिया आणि बजाज ऑटो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. बीएसई मिडकॅपमध्ये २.७ टक्क्यांचा तर स्मॉलकॅपमध्ये ३ टक्क्यांची घट झाली आहे.


डॉलरच्या तुलनेत आजही रुपयाची घसरण झाली आहे. शुक्रवारच्या ७७.८४ रुपयाच्या तुलनेत सोमवारी रुपयाची किंमत ७८.२८ रुपयांवर पोहोचली आहे. रुपयाची ही आतापर्यंतची निचांक्क पातळी आहे. आज शेअर बाजार बंद होताना सार्वजनिक बँका, खासगी बँका, आयटी, रिअॅलिटी, कॅपिटल गुड्स, ऑटो, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये २ ते ४ टक्क्यांची घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध