पुणे (हिं.स.) महाराष्ट्रात रावण मुख्यमंत्री होऊन बसले असल्यामुळे त्यांना हनुमान चालीसा म्हणणा-यांची भीती वाटत असल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील जनतेला लुटण्याचे काम ठाकरे- पवार सरकार करत असून महाराष्ट्रातील जनताच आता सरकारची लंका जाळणार असल्याचा घणाघात भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला.
लोहगाव येथील भाजपचे माजी उपसरपंच सुनील खांदवे-मास्तर यांनी वारकऱ्यांसाठी रेनकोट, तंबूचे वाटप तसेच विविध कोर्सचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. किरीट सोमय्या बोलताना म्हणाले, हनुमान चालीसा म्हणणारा जेलमध्ये जातो आणि दाऊदचा हस्तक मात्र मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो.
मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व गहाण ठेवले असून सचिन वाजे हा माफीचा साक्षीदार झाल्यामुळे आता अनिल परब यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचेदेखील नाव वसुली प्रकरणात येऊ शकते. त्यामुळे त्यांना भिती वाटत आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…