दिल्लीतील नव्या संसद भवनाला महाराष्ट्राचे सागवान

मुंबई : वन विकास महामंडळाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा आगारात मोठ्या प्रमाणात सागवान येते. हा सागवान गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलातून येते. विभागातून सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत दिल्ली येथे नव्या संसद भवनाचे बांधकाम होत आहे. या नव्या संसद भवन बांधकामाकरिता सुमारे ३०० घनमीटर सागवान लाकूड बल्लारशा आगारातून खरेदी करण्यात आले आहे. दोन दिवसात २२ कोटींचे सागवान विक्री करण्यात आले आहे. २०२२-२०२३ मध्ये १६५ कोटींच्या सागवानाची या आगारातून विक्री झाली आहे. महाराष्ट्रात वन विकास महामंडळ हे शासनाचे अंगीकृत व्यवसाय केंद्र आहे. महामंडळात दर्जेदार सागवानाची निर्मिती करून त्याची विक्री केली जाते.


वनविकास महामंडळातील दर्जेदार सागवानाचा भारताच्या संसद भवनासाठी वापर होत असल्याने ही बाब महामंडळासाठी गौरवास्पद आहे. ७ जून २०२२ रोजी बल्लारशा विक्री आगारातून जाहीर लिलावात फायनल फिलिंग दर्जेदार सागाची विक्रमी विक्री करण्यात आली. यातून महामंडळाला दोन दिवसात २२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. येथून २०२२-२०२३ या वर्षात १६५ कोटी रुपयांच्या वनउपजाची विक्री झाली आहे. मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे. ऑफलाइन लिलावात जवळपास १०० कोटी रुपयांचा महसूल महामंडळाला मिळाला आहे, अशी माहिती बल्लारपूर वनविकास महामंडळाचे सहायक वनसंरक्षक गणेश मोटकर यांनी सांगितले.


चंद्रपूरच्या सागवान लाकडाचा पॅटर्न अतिशय चांगला आहे. हा लाकूड टिकाऊ आहे. यासंदर्भात टेस्टिंग सर्टीफिकेट करण्यात आलं. वेगवेगळ्या पातळ्यांवर या सागवान लाकडाच्या चाचण्या झाल्या. हा उत्तम लाकूड असल्याचं तज्ज्ञांना लक्षात आले. टिकाऊता, उपयुक्तता आणि अतिशय आकर्षक असा हा सागवान लाकूड आहे. यामुळे या लाकडाला पसंती देण्यात आली. इथं असलेलं लाकूड हे मुख्यत्व चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून आलेले आहे. संसद भवनाच्या बांधकामाची शोभा वाढविण्यासाठी उत्कृष्ट लाकडाची आवश्यकता होती. त्यासाठी देशभरातील लाकडाची चाचपणी करण्यात आली. यात चंद्रपूर, गडचिरोलीचा लाकूड उत्कृष्ट असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. त्यामुळे या लाकडाची निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये